AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parbhani : यंदाच्या हंगामात क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचे गाळप, ऊस उत्पादकांवर मात्र चिंतेचे ढग कायम

गेल्या 6 महिन्यापासून सुरु असलेले साखर कारखान्याचे धुराडे आता बंद होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे तर आता पावसालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे कारखाने नाईलाजास्तव का होईना बंद करावेच लागणार आहेत. गेल्या 6 महिन्यात जिल्हाभरातील 6 साखर कारखान्याने तब्बल 40 लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे.

Parbhani : यंदाच्या हंगामात क्षमतेपेक्षा जास्त ऊसाचे गाळप, ऊस उत्पादकांवर मात्र चिंतेचे ढग कायम
अतिरिक्त ऊसImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 12:14 PM
Share

परभणी : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगामा अनेक अंगाने चर्चेचा विषय ठरला आहे. चार महिने सुरु राहणार हंगाम यंदा 7 महिने उलटले तरी सुरुच आहे. असे असतानाही (Maharashtra) राज्यात ऊस गाळपापेक्षा शिल्लक उसाचीच चर्चा अधिक राहिली आहे. अखेर पावसाला सुरवात झाल्यामुळे राज्यातील  (Sugar Factory) साखर कारखाने आता बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावणारच आहे. असे असले तरी परभणी जिल्ह्यामध्ये यंदा रेकॉर्डब्रेक असे 40 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा 10 लाख मेट्रिक टनाने गाळप वाढले आहे. असे असले तरी जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे.

दोन दिवसांमध्ये कारखाने होणार बंद

गेल्या 6 महिन्यापासून सुरु असलेले साखर कारखान्याचे धुराडे आता बंद होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी ऊसतोड कामगारांनी परतीची वाट धरली आहे तर आता पावसालाही सुरवात झाली आहे. त्यामुळे कारखाने नाईलाजास्तव का होईना बंद करावेच लागणार आहेत. गेल्या 6 महिन्यात जिल्हाभरातील 6 साखर कारखान्याने तब्बल 40 लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. कधी नव्हे ते जिल्ह्याच ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. ऊसाचे क्षेत्र अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचे गाळप होणे शक्य झाले नाही. शिवाय साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप करुनही ही परस्थिती ओढावली आहे.

अतिरिक्त उसाचे काय?

साखऱ आयुक्तालयाच्या सूचनांप्रमाणे राज्यभऱातील साखर कारखान्यांनी गाळप सुरु ठेवले होते. अतिरिक्त उसाचा वाढीव आकडा येताच इकडे गाळपाचा कालावधीही वाढत गेला. त्यामुळे 4 महिन्याच संपुष्टात येणार हंगाम 6 महिने तर सुरुच राहिला पण तरीही ऊसाचा संपूर्ण प्रश्न मार्गी लागलेला नाही. आता पावसाला सुरवात झाल्याने ना तोड शक्य आहे ना हार्वेस्टर शेतामध्ये जातेय. त्यामुळे अतिरिक्त उसाच्या बाबतीत सरकार काय धोरण राबवतंय हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

6 कारखान्यांची धुराडी सुरु

यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असला तरी साखर कारखान्यांनी त्यांची भूमिका पार पाडली आहे. गाळप हंगाम तर लांबलाच पण क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप साखर कारखान्यांनी केले आहे. परभणी जिल्ह्यात 6 साखर कारखान्यांच्या माध्यमातून तोड सुरु होती. आता 6 महिन्यानंतर गाळप बंद होणार असले तरी साखर कारखान्याचे प्रयत्न पुरते कामी आले नाहीत हेच खरे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.