AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Farming : काय सांगता? मराठवाड्यातही नारळाच्या बागा, कृषी तज्ञांनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र..!

मराठवाड्यासारख्या दुष्काळी आणि आवर्षनाच्या क्षेत्रात नारळाच्या बागा...हे जरा अवास्तव वाटतंय ना. कारण नारळाच्या बागा म्हणलं की आपल्या समोर येतो तो कोकण विभाग. येथील थंड वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे येथे नारळाच्या बागा बहरत आहेत. पण मराठवाड्यातही नारळाची लागवड करण्यासाठी वाव असल्याचे खुद्द नारळ विकास बोर्डानेच स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात शहाळा उत्पादनासाठी नारंगी जातीचा वापर करण्याचे आवाहन नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. अमेय देबनाड यांनी सांगितले आहे.

Coconut Farming : काय सांगता? मराठवाड्यातही नारळाच्या बागा, कृषी तज्ञांनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र..!
नारळाची शेतीबाबत नारळ विकास बोर्डानेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
| Updated on: Feb 24, 2022 | 11:36 AM
Share

औरंगाबाद : (Marathwada) मराठवाड्यासारख्या दुष्काळी आणि आवर्षनाच्या क्षेत्रात नारळाच्या बागा…हे जरा अवास्तव वाटतंय ना. कारण नारळाच्या बागा म्हणलं की आपल्या समोर येतो तो कोकण विभाग. येथील (Cold Environment) थंड वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे येथे नारळाच्या बागा बहरत आहेत. पण मराठवाड्यातही (Coconut cultivation) नारळाची लागवड करण्यासाठी वाव असल्याचे खुद्द नारळ विकास बोर्डानेच स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात शहाळा उत्पादनासाठी नारंगी जातीचा वापर करण्याचे आवाहन नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. अमेय देबनाड यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर त्याअनुशंगाने औरंगाबाद विभागातील मंडळाच्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन याबाबत जनजागृती केली आहे.

अशा पध्दतीने घ्या नारळाचे उत्पादन..

कोणत्याही पिकाचे उत्पादन घेण्यासाठी तेथील वातावरण पोषक असणे गरजेचे आहे. शिवाय वातावरणानुसार वाण ठरवले तर उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. हीच पध्दती नारळ विकास बोर्डाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून देलेली आहे. शहाळा उत्पादनासाठी नारंगी जातीचा वापर येथील शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. लागवडीनंतर 5 वर्षात उत्पादन सुरु करण्यासाठी वर्षातून तीन वेळा संतुलीत खताची मात्रा द्यावी लागणार आहे. यामध्ये 50 किलो कंपोष्ट खत, अडीच किलो युरिया, 3 किलो सुपर फॉस्फेट, दीड किलो पोटॅश हे विभागून द्यावे लागणार आहे. नारळ हे एक कल्पवृक्ष आहे त्यानुसार 22 ते 23 किलो कंपोस्ट खत द्यावे लागणार आहे.

महिला शेतकऱ्यांचे योगदान महत्वाचे

शेती व्यवसयाचा खरा भार हा महिला शेतकऱ्यांच्या खांद्यावरच आहे. त्यामुळे आशा वृक्ष लागवडीकडे त्यांनीच लक्ष दिले तर नारळाचे क्षेत्र वाढणार आहे. शिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनाच प्राधान्य आहे. योग्य व्यवस्थापन केले तर मराठवाड्यातही नारळाची शेती सहज शक्य आहे. त्यामुळे सुरवातीला कमी प्रमाणातच लागवड करुन नारळ वाढीचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा सल्ला डॉ. अमेय देबनाड यांनी दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यातही नारळाच्या बाग क्षेत्र वाढले तर आश्चर्य नाही पण यासाठी आवधी लागणार हे नक्की

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांना मिळतोय जोडव्यवसयाचा ‘आधार’, गायीच्या दूधदरात अखेर वाढ?

Good News : केळीचा गोडवा वाढला, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला

Onion Export : निर्यातदारांना आता उन्हाळी हंगामातील कांद्याची प्रतिक्षा, लाल कांद्याचा काय आहे ‘वांदा’ ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.