AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदी आनंद गडे : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार? हंगामही अंतिम टप्प्यात

रब्बी हंगामाच्या सुरवातीच्या काळातील निसर्गाचा लहरीपणा वगळता यंदा उत्पादकता वाढीसाठी पोषक वातावरण राहिलेले आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभरा या पिकावर भर दिला होता. शिवाय (Agricultural Department) कृषी विभागानेही याबाबतच जनजागृती केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून हरभरा काढणीचा श्रीगणेशा झालेला आहे.

आनंदी आनंद गडे : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघणार? हंगामही अंतिम टप्प्यात
यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला उत्पादन वाढेल अशी आशा आहे.
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 9:34 AM
Share

नांदेड :  (Rabi Season) रब्बी हंगामाच्या सुरवातीच्या काळातील निसर्गाचा लहरीपणा वगळता यंदा उत्पादकता वाढीसाठी पोषक वातावरण राहिलेले आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करुन हरभरा या पिकावर भर दिला होता. शिवाय (Agricultural Department) कृषी विभागानेही याबाबतच जनजागृती केली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असून हरभरा काढणीचा श्रीगणेशा झालेला आहे. अतिवृष्टीमुळे यंदा नांदेड जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीक्षेत्रात सरासरीच्या दुप्पटीपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. याचप्रमाणे उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रयत्न केले असून कृषी विभागाचे मार्गदर्शन कायम राहिलेले आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र हे 1 लाख 40 हजार हेक्टर असून प्रत्यक्षात पेरा मात्र, 3 लाख 57 हजार हेक्टरावर झाला आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची भरपाई रब्बी हंगामातून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत.

यंदा उत्पादकताही चांगली

पीक कापणी होण्यापूर्वी कृषी विभागाकडून अंदाजे उत्पादकता काढली जाते. यंदा सर्वाधिक उत्पाकता ही अकोला जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यात हेक्टरी 15 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्याची उत्पादकता ही 11.50 क्विंटल एवढी आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अधिकचे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. पोषक वातावरणामुळे हे शक्य झाले आहे. शिवाय मध्यंतरी वातावरणात बदल होऊनही शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी केल्याने त्याचा उत्पादकतेवर परिणाम झाला नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी सांगितले आहे.

पोषक वातावरणाला थंडीची साथ, उत्पादनात वाढ

रब्बी हंगामातील पिके बहरत असतानाच मराठवाड्यात थंडीची चांगलीच लाट पसरली होती. जानेवारी अखेर पर्यंत थंडीची तीव्रता होती, त्याचा रब्बी हंगामातील पिकांना चांगलाच फायदा झाला आहे. नांदेडमध्ये यंदा हरभरा पिकांचे तर विक्रमी उत्पादन होईल अशी आशा जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी व्यक्त केलीय. तसेच गहू पिकाला पोषक वातावरण राहिल्याने गव्हाच्या उताऱ्यात वाढ होईल असाही अंदाज आहे. उन्हाळी ज्वारी, करडई आणि भुईमूग पिकाला देखील थंडी पोषक अशीच ठरलीय. मध्यंतरी मर रोगाचा काहीसा प्रादुर्भाव पिकांवर जाणवला होता, मात्र उन्हाची तीव्रता वाढताच हा प्रादुर्भाव नाहीसा झाला होता.

अखेर पीक पध्दतीमधील बदल ठरला फायदेशीर

कधी नव्हे ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मुख्य पिकांना बाजूला सारुन रब्बी हंगामात कडधान्यावर भर दिली होती. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे पिकेही बदलली पण उत्पादनात वाढ होणार का नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, पोषक वातावरणामुळे हा प्रयोग देखील यशस्वी ठरलेला आहे. ज्वारीची जागा आता हरभरा, राजमा आणि उन्हाळी सोयाबीनने घेतलेली आहे. अंतिम टप्प्यापर्यंत पिकांची वाढ तर जोमात झाली असून उत्पादनातही वाढ झाली तर खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघेल.

संबंधित बातम्या :

Mango : फळमाशीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कोणत्या फळाला अधिकचा धोका?

Grape : निसर्गाच्या लहरीपणावर मात करुनही द्राक्ष उत्पादक अडचणीतच, निर्यातीवरही परिणाम..!

युट्यूब पाहून अफू पिकवला, पोलिसांची थेट बांधावरच धाड; वाळकी शिवारात नेमके काय घडले?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.