AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात कापसाचे क्षेत्रही घटले अन् उत्पादनही, काय आहेत कारणे..?

कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी कवडीमोल दर यामुळे मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र घटत आहे. सोयाबीनप्रमाणेच कापूस हे खरिपातील मुख्य पिक होते. मात्र, काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी सोयाबीन या नगदी पिकावरच भर दिला होता. त्यामुळे तब्बल 3 लाख हेक्टराने कापसाच्या क्षेत्रात घट झाली होती.

मराठवाड्यात कापसाचे क्षेत्रही घटले अन् उत्पादनही, काय आहेत कारणे..?
संग्रहित छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 16, 2021 | 3:13 PM
Share

लातूर : कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी कवडीमोल दर यामुळे ( Marathwada) मराठवाड्यात (Cotton production) कापसाचे क्षेत्र घटत आहे. सोयाबीनप्रमाणेच कापूस हे खरिपातील मुख्य पिक होते. मात्र, काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी सोयाबीन या नगदी पिकावरच भर दिला होता. त्यामुळे तब्बल 3 लाख हेक्टराने कापसाच्या क्षेत्रात घट झाली होती. शिवाय लागवड केलेल्या कापसाला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनही निम्म्यावरच आलेले आहे. सध्या कापसाचे दर वाढत असले तरी झालेला खर्च आणि घटलेले उत्पादन यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे.

मराठवाड्यातील बीड, हिंगोली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन हे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर घेतले जात होते. पण दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनवर राहिलेला आहे. कापूस उत्पादनाला अधिकचा वेळ आणि वेचणी दरम्यान मजुरांचा वणवा यामुळे सोयाबीन याच नगदी पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. पण यंदा या दोन्हीही पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

कपाशीचे सरासरी क्षेत्र 18 लाख हेक्टर

सोयाबाीनप्रमाणेच कापूसही खरिपातील मुख्य पिक होते. परंतू, यंदा तर सरासरी क्षेत्रामध्येही घट झाली आहे. केवळ 15 लाख हेक्टर एवढेच कापसाचे क्षेत्र आता मराठवाड्यात राहिले आहे. यापैकी 12 लाख 68 हजार हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यापुर्वी कापसाला 3 ते 4 हजार प्रति क्विंटलचा दर मिळाला होता तर सोयाबीन हे चढ्या दराने विकले जात होते. शिवाय कापसातील बोंडअळीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हे त्रस्त होते. त्यामुळेच कापसापेक्षा सोयबीनला शेतकऱ्यांनी अधिकची पसंती दिली होती. बीड जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे घटलेले आहे.

उत्पादनातही घट

यंदा पावसाचा परिणाम खरिपातील सर्वच पिकांवर झालेला आहे. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले असले तरी ऐन वेचणीच्या दरम्यानच पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादनही निम्म्यावरच आलेले आहे. सध्या बिटी कापूस शेतकऱ्यांनी काढून टाकला असला तरी देशी कापूस अद्यापही वावरातच आहे. मात्र, उत्पादन घटल्याने काढणी खर्चही परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. सध्या कापसाचे दर वाढले असले तरी घटत्या उत्पादनामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.

एकरी एक क्विंटलच उत्पादन

पावसाचा परिणाम उत्पादनावर झाला असून यंदा केवळ एकरी एकच क्विंटल उत्पादन मराठवाड्याती शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. यामध्ये कापूस वेचणीचा दर हा 12 रुपये प्रति किलोचा आहे. त्यामुळे उत्पादन तर घटले आहेच शिवाय कापूस शेतातून बाहेर काढण्यासाठीही अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कापतसाच्या दरात वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे बदलत्या परस्थितीमुळे क्षेत्रात तर घट झालीच आहे. पण पावसामुळे उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे.

संबंधित बातम्या :

गरोदर गायीसाठी डोहाळजेवण आंध्रप्रदेशात जोपासली जातेय परंपरा

प्रक्रियेतच अडकली 5 लाख शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम, नेमकी काय आहे अडचण?

कापूस पिकाचे फरदड शेतकऱ्यांच्या नुकसानीचे की फायद्याचे ?

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक