Rabi Season: आपला शेतकरीही आता कमर्शियल, पारंपरिक पिकांना डावलून कडधान्यावरच भर

हंगाम कोणताही असो आता पीक पध्दतीमध्ये बदल ही मोठी गोष्ट राहिलेली नाही. शेतकरीच बाजारपेठेचा अंदाज बांधून उत्पादन घेत आहे. रब्बी हंगाम म्हणलं की गहू, हरभरा ज्वारी हीच मुख्य पिके. शिवाय यामध्ये बदल केला तर नुकसानच अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र, आता परंपरेला नाही तर नगदी पिकांना अधिकचे महत्व दिले जात आहे.

Rabi Season: आपला शेतकरीही आता कमर्शियल, पारंपरिक पिकांना डावलून कडधान्यावरच भर
वाशिम जिल्ह्यामध्ये मोहरीचे क्षेत्र वाढले असून पोषक वातावरणामुळे पिक असे बहरले आहे.
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 4:18 PM

वाशिम : हंगाम कोणताही असो आता पीक पध्दतीमध्ये बदल ही मोठी गोष्ट राहिलेली नाही. शेतकरीच बाजारपेठेचा अंदाज बांधून उत्पादन घेत आहे. (Rabbi Season) रब्बी हंगाम म्हणलं की गहू, हरभरा ज्वारी हीच मुख्य पिके. शिवाय यामध्ये बदल केला तर नुकसानच अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र, आता परंपरेला नाही तर नगदी पिकांना अधिकचे महत्व दिले जात आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरण असताना शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये मोठा बदल केला आहे. (Marathwada) मराठवाड्यात रब्बी हंगामात प्रथमच सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. तर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये कडधान्य असलेल्या (Mustard) मोहरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे हंगाम कोणताही असो उत्पन्नात कशी वाढ होईल याचाच विचार शेतकरी करीत आहेत. शिवाय या अभिनव उपक्रमाला कृषी विभागाचेही पाठबळ मिळत आहे. यंदा प्रथमच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बदल तर केला आहे पण आता त्या प्रमाणात उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांचे धाडसही वाढणार आहे.

कमी खर्चात अधिकचे उत्पन्न

पारंपरिक पिकांमधून उत्पादन तर कमीच पण अधिकचा खर्च आणि कष्टही. मात्र, जनावरांना चारा आणि खाण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्वारीचा पेरा कधीच कमी होत नव्हता. पण मराठवाड्यात देखील ज्वारीचे क्षेत्र हे घटलेले आहे. तर वाशिम जिल्ह्यामध्ये मोहरीचे क्षेत्रात विक्रमी वाढ झालेली आहे. या भागात गहू, हरभरा या पिकांवरच शेतकऱ्यांचा भर असत. मात्र, यंदा ही परस्थिती बदललेली आहे. कमी खर्चात,कमी कालावधीत भरघोस पीक देणारी मोहरी असल्याने जिल्ह्यातील शेतकरी या पिकाकडे वळत आहे.यंदा जिल्ह्यात जवळपास दीड हजार एकरावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यंदा वातावरण इतर पिकाला उपयुक्त नसताना ही मोहरी चे चांगलेच बहरले आहे.

मध्यंतरीच्या वातावरणाचा परिणाम

रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच मध्यंतरी अवकाळी पाऊस, गारपिट आणि अंतिम टप्प्यातील गारवा. तशी थंडी ही रब्बी हंगामातील पिकांना पोषकच असते मात्र, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की दुष्परिणामच अगदी त्या प्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण कोरडे होताच शेतकऱ्यांनी फवारणी केल्याने पुन्हा रब्बी हंगामातील पिके बहरलेली आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा प्रथमच मोहरीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयोग असून उत्पादन वाढीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Untimely Rain : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, तरीही उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय आहे सल्ला ?

P.M.KISAN : योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील अन् रक्कमही परत, काय आहे धोरणात बदल?

अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.