AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Untimely Rain : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, तरीही उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय आहे सल्ला ?

सातत्याने वातावरणात बदल होत आहे. खरिपात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर आता रब्बी हंगामामध्येही तीच अवस्था आहे. लाखो हेक्टरमधील लाखो शेतकऱ्यांची (Crop Damage) पिके पडली आहेत किंवा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. शेतात असलेले पीक कसे वाचवायचे हे शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे.

Untimely Rain : अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, तरीही उत्पादन वाढीसाठी कृषितज्ञांचा काय आहे सल्ला ?
केळी बागा अंतिम टप्प्यात असताना सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 07, 2022 | 3:17 PM
Share

मुंबई : यंदा सातत्याने वातावरणात बदल होत आहे. खरिपात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर आता रब्बी हंगामामध्येही तीच अवस्था आहे. लाखो हेक्टरमधील लाखो शेतकऱ्यांची (Crop Damage) पिके पडली आहेत किंवा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. शेतात असलेले पीक कसे वाचवायचे हे शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. आशा प्रतिकूल परस्थितीमध्ये (Advice from agriculturalists) कृषितज्ञांचा सल्लाच फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा (Drug spray) औषध फवारणीवर अधिकचा खर्च करुनही काही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांनी संयम राखून सर्व प्रथम सल्ला घेऊनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी पिके कशी वाचवता येतील याकडे अधिक लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी भागात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान 9.9 अंश सेल्सिअ तर कमाल तापमान 20.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदवले गेले आहे. याचबरोबर 29.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे विशेषत: फळपिकांवर त्याचा वाईट परिणाम झाला तर तो कसा कमी करता येईल, हेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

आंबा आणि लिची फळांची अशी घ्या काळजी

सरासरीपेक्षा तापमानात घट झाली तर त्याचा परिणाम आंबा मोहरावर होतो. शिवाल लिची फळाचेही नुकसान होते. तापमान 10 अंशापर्यंत आल्यास मोहर गळतो किंवा जागेवरच वाळून जातो. त्यामुळे संपूर्ण हंगामाच धोक्यात येऊ शकतो. या दरम्यान मोहर हा काळा पडतो. हे नुकसान टाळण्यासाठी डॉ. एस. सिंग सांगतात की, हेक्साकोनाझोल 1 मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या आंबा झाडांना मोहर आलेलाच नाही किंवा लिची अजून फुलले नाहीत त्यावर याचा अनुकूल परिणाम होणार आहे. शिवाय पावसाच्या पाण्याने लिचीवरील कीड धुऊन जाणार असून हे फळपिकही बहरणार आहे.

पपई पिकाचे संरक्षण महत्वाचे

ऑक्टोंबर महिन्यात लागवड केलेली पपई ता सुमारे चार महिन्यांची झाली आहे. पपई पीक हे 24 तासापेक्षा अधिकच्या काळात पाण्यात राहिले तर पुन्हा वाचवणे अशक्य आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक होते त्या ठिकाणाहून त्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पावसामुळे माती ओली झाली होते आणि माती सुकल्यानंतर हलकी मशागत करावी लागणार आहे. वातावरण कोरडे झाल्यावर 100 ग्रॅम युरिया 50 ग्रॅम म्युरेट पोटॅश आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेटा डोस महत्वाचा राहणार आहे. पपईतील मूळ कार्य आणि विषाणूजन्य आजारांसाठी सांगितलेले उपाय दर महिन्यातून करणे गरजेचे आहे. शिवाय मार्च-एप्रिलमध्ये पपईची लागवड करण्यासाठी रोपवाटिकेत पपईचे बी टाकल्याने पुढील हंगामातील नियोजन होणार आहे.

पुन्हा बहरू शकतात केळीच्या बागा

हिवाळ्यात जेव्हा तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाते आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो त्यावेळी केळीची झाडेही कोसळतात. याच दरम्यान केळीची पाने अधिक फुलतात. त्यामुळे रोगट पाने शेतातून कापून टाकावी लागणार आहेत. यामुळे रोगराईची तीव्रताही कमी होईल. माती कोरडी झाल्यावर 200 ग्रॅम युरिया, 200 ग्रॅम म्युरेटर ऑफ पोटॅश आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति केळीच्या रोपाचा वापर करावा. यामुळे वनस्पती लवकर निरोगी असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा केळीची बाग येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पुन्हा हिरवीगार दिसेल.

संबंधित बातम्या :

P.M.KISAN : योजनेतील अपात्र शेतकऱ्यांचे खाते सील अन् रक्कमही परत, काय आहे धोरणात बदल?

अवकाळीच्या नुकसानी खुणा : निसर्गानं सर्वकाही हिरावलं आता शेतकऱ्याचं सरकारकडे हे साकडं!

Sugarcane fire : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 39 शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा