AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं, कांद्याच्या पंढरीत कांद्याच्या दराची लाली उतरली; काय आहे कारण?

नाशिक जिल्ह्यात कांदा बळीराजाला रडवतोय. बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांद्यानं पुन्हा बळीराजाला रडवलं, कांद्याच्या पंढरीत कांद्याच्या दराची लाली उतरली; काय आहे कारण?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 14, 2023 | 7:45 AM
Share

नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ( Onion Market )ओळख आहे. इतकंच नव्हे तर कांद्याच्या बाजारपेठेसाठी आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून देखील नाशिकची ओळख ( Nashik News ) आहे. नाशिक मधील लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत बाजार समिती, नाशिक बाजार समिती, यांसह येवला, मनमाड, उमराणे अशा बाजार समित्यांमध्ये सध्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नाशिक मध्ये साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान लाल कांदा बाजारात येऊ लागतो. तेव्हापासूनच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून अखेरपर्यन्त कांद्याचे भाव वधारले नाही.

लाल कांद्याची आवक बघून बाजार समितीमध्ये कांद्याचे दर व्यापारी ठरवत असतात मात्र यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच कांद्याचे दर हे कमी प्रमाणात आहे. दोन तीन हजारापर्यंत असणारे दर आत्ताच्या घडीला हजार रुपयांच्या खाली येऊन ठेपले आहे.

त्यामुळे कवडीमोल भावाने कांदा आता शेतकर्‍यांना विकावा लागतोय. बाजार समितीमध्ये आल्यानंतर कांद्याची किंमत अत्यंत कवडीमोल भावात व्यापारी करत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.

कांदा पीकासाठी झालेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः संताप व्यक्त करतोय. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ची ओळख आहे. तिथेही वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील दोन आठवड्यापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. अंदरसुल बाजार समितीत कालच्या बाजारभावाची स्थिती पाहता हजार रुपयांच्या आतमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कांदा पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवू लागला आहे. लाल कांद्याचे भाव सरासरी 900 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामध्ये किमान बाजारभाव 200 ते जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत भाव आले आहेत.

लाल कांदा हा साठवू शकत नाही. लाल कांदा हा टिकाऊ नसतो. त्याला लगचेच मोड येण्यास सुरुवात होते. याशिवाय खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उन्हाळ कांद्यासारखा लाल कांदा साठवता येत नाही. त्याचा एक फटका शेतकऱ्यांना बसतोय.

लासलगाव बाजार समितीसह इतर जिल्ह्यातील बाजार समितीत येणाऱ्या कांद्याची आवक बघता मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी उशिराने लागवड करण्यात आली होती. त्यामुळे एकाच वेळी कांद्याची आवक झाली आहे.

ही परिस्थिती सुधारेल अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. व्यापारी वर्गातही हा कांदा खरेदी करण्यावरून संभ्रम आहे. लाल कांद्याची मागणीही स्थिर असल्याने कांद्याचे दार वाढतील अशी स्थिती नाही असेही तज्ज्ञ सांगत आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल