AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : अखेर खरिपाची हुलकावणीच, तूर धोक्यात, साठवणूक करुनही सोयाबीन-कापसाचे दर कोमात

हंगामाच्या सुरवातीपासूनच पिकांवर नैसर्गिक संकट ओढावले ते काढणीपर्यंतही कायम राहिले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण दर्जा ढासळल्याने दरावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बहरात असलेली तुरही अंतिम टप्प्यात अळीच्या कचाट्यात सापडलेली आहे.

Kharif Season : अखेर खरिपाची हुलकावणीच, तूर धोक्यात, साठवणूक करुनही सोयाबीन-कापसाचे दर कोमात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 21, 2021 | 5:43 PM
Share

जालना : हंगामाच्या सुरवातीपासूनच पिकांवर नैसर्गिक संकट ओढावले ते काढणीपर्यंतही कायम राहिले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण दर्जा ढासळल्याने दरावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बहरात असलेली तुरही अंतिम टप्प्यात अळीच्या कचाट्यात सापडलेली आहे. त्यामुळे अधिकचे उत्पादन तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही पदरी पडलेला नाही. आता तुरीच्या काढणीच्या प्रसंगीच अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे शेवटच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या आशा देखील मावळलेल्या आहेत.

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

खरिपातील केवळ तूर पिक हे बहरात होते. अतिवृष्टीचा देखील तुरीवर परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे सोयाबीनमधून नुकसान झाले तरी तुरीतून ते भरुन निघणार असा शेतकऱ्यांना आशावाद होता. पण काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या अखेरच्या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे कळी आणि फुलोऱ्यात असलेल्या तुरीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. खरिपातील नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

तुरीवरील किडीचे करा असे नियंत्रण

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव असेल तर निंबोळी अर्क 5 टक्के, अझाडिरॅकटीन 300 पीपीएम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के एसजी हे कीटकनाशक 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात दुसरी फवारणी करावी लागणार आहे. त्यानंतरच अळी अटोक्यात येऊन उत्पादनात वाढ होणार आहे.

सोयाबीन-कापसाच्या साठवणूकीवर भर

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर हे कमी होते. मात्र, उत्पादन कमी असूनही दर खालावल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला. त्यामुळे का होईना दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढले अन् शेतकऱ्यांना फायदा झाला मात्र, आता पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घट होत आहे. दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र, केंद्र सरकारचे धोरण आणि घटती मागणी यामुळे साठवलेल्या सोयाबीनला दर मिळेल का नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. सोयाबीनप्रमाणेच कापूस साठणूक केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला 9 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर होता मात्र, आता आवक वाढूनही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाचीही साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. परंतू, दराबाबत सर्वकाही अलबेलच आहे.

संबंधित बातम्या  :

MSEDCL : शेतकऱ्यांकडून विजबीलाची वसुली अन् सरकारकडून कृषी पंपाची जोडणी, काय आहे सरकारचे धोरण?

आस्मानी संकटापेक्षा शेतकऱ्यांवर सध्या सुलतानी संकट, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सराकरवर घणाघात

Central Government : मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार

Follow Us
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...