AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : अखेर खरिपाची हुलकावणीच, तूर धोक्यात, साठवणूक करुनही सोयाबीन-कापसाचे दर कोमात

हंगामाच्या सुरवातीपासूनच पिकांवर नैसर्गिक संकट ओढावले ते काढणीपर्यंतही कायम राहिले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण दर्जा ढासळल्याने दरावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बहरात असलेली तुरही अंतिम टप्प्यात अळीच्या कचाट्यात सापडलेली आहे.

Kharif Season : अखेर खरिपाची हुलकावणीच, तूर धोक्यात, साठवणूक करुनही सोयाबीन-कापसाचे दर कोमात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 5:43 PM
Share

जालना : हंगामाच्या सुरवातीपासूनच पिकांवर नैसर्गिक संकट ओढावले ते काढणीपर्यंतही कायम राहिले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला होता. त्यामुळे उत्पादनात तर घट झालीच पण दर्जा ढासळल्याने दरावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बहरात असलेली तुरही अंतिम टप्प्यात अळीच्या कचाट्यात सापडलेली आहे. त्यामुळे अधिकचे उत्पादन तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही पदरी पडलेला नाही. आता तुरीच्या काढणीच्या प्रसंगीच अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे शेवटच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या आशा देखील मावळलेल्या आहेत.

तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

खरिपातील केवळ तूर पिक हे बहरात होते. अतिवृष्टीचा देखील तुरीवर परिणाम झालेला नव्हता. त्यामुळे सोयाबीनमधून नुकसान झाले तरी तुरीतून ते भरुन निघणार असा शेतकऱ्यांना आशावाद होता. पण काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे या अखेरच्या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे कळी आणि फुलोऱ्यात असलेल्या तुरीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. खरिपातील नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

तुरीवरील किडीचे करा असे नियंत्रण

तुरीवर अळीचा प्रादुर्भाव असेल तर निंबोळी अर्क 5 टक्के, अझाडिरॅकटीन 300 पीपीएम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के एसजी हे कीटकनाशक 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात दुसरी फवारणी करावी लागणार आहे. त्यानंतरच अळी अटोक्यात येऊन उत्पादनात वाढ होणार आहे.

सोयाबीन-कापसाच्या साठवणूकीवर भर

हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे दर हे कमी होते. मात्र, उत्पादन कमी असूनही दर खालावल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करण्यापेक्षा साठवणूकीवर भर दिला. त्यामुळे का होईना दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढले अन् शेतकऱ्यांना फायदा झाला मात्र, आता पुन्हा सोयाबीनच्या दरात मोठी घट होत आहे. दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र, केंद्र सरकारचे धोरण आणि घटती मागणी यामुळे साठवलेल्या सोयाबीनला दर मिळेल का नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. सोयाबीनप्रमाणेच कापूस साठणूक केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला 9 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर होता मात्र, आता आवक वाढूनही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाचीही साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. परंतू, दराबाबत सर्वकाही अलबेलच आहे.

संबंधित बातम्या  :

MSEDCL : शेतकऱ्यांकडून विजबीलाची वसुली अन् सरकारकडून कृषी पंपाची जोडणी, काय आहे सरकारचे धोरण?

आस्मानी संकटापेक्षा शेतकऱ्यांवर सध्या सुलतानी संकट, देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सराकरवर घणाघात

Central Government : मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.