AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकर्‍यांना दिलासा! आर्थिक मदत मिळणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

शेतकर्‍यांना दिलासा! आर्थिक मदत मिळणार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा
Dattatraya Bharane and Farmer
| Updated on: Sep 16, 2025 | 7:49 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे’ असं भरणे यांनी म्हटलं आहे.

मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. यावर बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, ‘ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.’

गेल्या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांना या पावसाचा फटका बसला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात 654 महसूल मंडळांमधील खरीप पिके धोक्यात आली आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात जास्त नुकसान झालेले जिल्हे

  • नांदेड – 7,28,049 हेक्टर
  • वाशीम – 2,03,098 हेक्टर
  • यवतमाळ – 3,18,860 हेक्टर
  • धाराशिव – 1,57,610 हेक्टर
  • अकोला – 177,466 हेक्टर
  • सोलापूर – 47,266 हेक्टर
  • बुलढाणा – 89,782 हेक्टर

कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका?

गेल्या दोन महिन्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...