AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cultivation of Agriculture: रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात, भर उन्हाळ्यातील शेती मशागतीचे फायदे काय?

यंदा रब्बी हंगाम महिनाभराने लांबणीवर पडलेला आहे. अधिकच्या पावसामुळे रब्बी पेरणीला उशिर झाला असून त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे रब्बी हंगाम उरकताच शेतकरी आता शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरण, मोगडणी, कुळपणी, रोटरणे यासारखी मशागतीची कामे केली जातात तर पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतजमिनीमध्ये गाळ टाकणे, सुपिकता वाढवणे अशी कामे करुन घेतली जाता. शिवाय उन्हाळ्यात ही कामे करुन घेण्याचे एक ना अनेक फायदे होत आहेत.

Cultivation of Agriculture: रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात, भर उन्हाळ्यातील शेती मशागतीचे फायदे काय?
इंधन दरावाढीमुळे पुन्हा बैलजोडीने शेती मशागतीची होऊ लागली आहेत.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 6:32 PM
Share

नांदेड : यंदा (Rabi Season) रब्बी हंगाम महिनाभराने लांबणीवर पडलेला आहे. अधिकच्या पावसामुळे रब्बी पेरणीला उशिर झाला असून त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे रब्बी हंगाम उरकताच शेतकरी आता (Agricultural Cultivation) शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरण, मोगडणी, कुळपणी, रोटरणे यासारखी मशागतीची कामे केली जातात तर पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतजमिनीमध्ये गाळ टाकणे, सुपिकता वाढवणे अशी कामे करुन घेतली जाता. शिवाय (Summer Work) उन्हाळ्यात ही कामे करुन घेण्याचे एक ना अनेक फायदे होत आहेत. काळाच्या ओघात मशागतीमध्ये यंत्राचा वापर वाढला असला तरी आजही शेतकरी बैलजोडीच्या सहायाने ही कामे उरकून घेत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पीक कापणी झाल्यानंतर भर उन्हामध्ये मशागतीचे कामे केली जात आहेत.

उन्हाळ्यातील शेतीमशागतीचा फायदा काय?

रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली की, शेतकरी शेती मशगतीवर भर देतो. वर्षभर विविध पिके घेतल्याने शेतजमिनीचा पोत खराब झालेला असतो. त्यामुळे खताचा डोस आणि योग्य पध्दतीने मशागत झाली तर उत्पादनात वाढ होणार आहे.शेत जमिनी आता वखरून त्यावर नांगर चालवल्या जातोय. उष्णतेच्या लाटेत जमीन तापली तरच येणारी सुगी चांगली येते, त्यासोबतच कीड आणि अळ्यांचा नायनाट होत असतो. त्यामुळे तळपत्या उन्हात बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.

आजही पारंपरिक औजारांवर भर

काळाच्या ओघात शेतीपध्दतीमध्ये बदल झाला असून उत्पादन आणि वेळीची बचत व्हावी म्हणून बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरण्यापासून ते पेरणीपर्यंतची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. असे असले तरी बैलजोडीशिवाय योग्य पध्दतीने शेती मशागत होत नाही असे कही शेतकऱ्यांचे म्हणणे असून ते बैलजोडीच्या मदतीनेच शेती मशागतीची कामे करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या बैलजोडीच्या माध्यमतातून कुळपणी, मोगडणे आदी कामे सुरु आहेत.

इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर परवडत नाही

शेती मशागतीमध्ये यांत्रिकिकरण वाढले असून त्यामुळे वेळेची बचत होत असली तरी शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुपटीने वाढला आहे. कारण सध्या शेतजमिनीची नांगरट करण्यासाठी एकरी 2 हजार रुपये तर रोटरण्यासाठीही 2 हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी 1 हजार रुपये, पेरणी 1 हजार 500 रुपये, पालकुट्टी 2 हजार 500 रुपये तर हळद काढणीसाठी एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रत्येक कामामध्ये दर वाढले आहेत.

संबंधित बातम्या :

PMFBY : वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान..! केंद्र सरकारचा मोठा निर्णय?

Central Government : खाद्यतेल, तेलबियांवरील साठामर्यादेच्या कालावधीत वाढ, दरावर काय परिणाम?

Lemon : हंगामी पिकेच शेतकऱ्यांना यंदा तारणार, कलिंगडपाठोपाठ लिंबाला ‘सोन्या’चा भाव

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.