Banana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय?
जळगाव, रावेल येथील केळीला अधिकतर मागणी ही उत्तर भारतामधून असते. यंदा या भागातील उत्पादनातही घट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर झालेला आहे. शिवाय केळीला बारमाही मागणी असते त्यामुळे हरियाणा ,मध्य प्रदेश ,काश्मीर येथून केळी घेण्यासाठी ट्रक दाखल झाले आहेत पण घटलेल्या उत्पादनामुळे 15 दिवस वेटींगवर थांबावे लागत आहे.
![Banana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय? Banana : उत्पादन घटले अन् केळीचे दर गगणाला भिडले, केळी खरेदीसाठी वाहनांच्या रांगाच-रांगा,जळगावत दराचे चित्र काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/03215104/New-Project-2022-07-03T162043.482.jpg?w=1280)
जळगाव : हंगामाच्या सुरवातीला किमान उत्पादनावर झालेला खर्च पदरी पडावा म्हणून व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन (Banana Rate) केळीचा दर ठरविला होता. असे असतानाही (Traders) व्यापाऱ्यांनी मनमानी करीत कवडीमोल दरात केळीची खरेदी केली होती. पण आता याच व्यापाऱ्यांना रांगेत उभे राहून केळी खरेदी कऱण्याची नामुष्की ओढावली आहे. केळी खरेदीसाठी ट्रान्सपोर्टवर 400 ते 500 ट्रक ह्या उभ्या आहेत. वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे ही स्थिती ओढावली आहे. जळगावातच नाहीतर इतरत्रही (Banana Production) केळी उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे सध्या केळी 22 ते 24 रुपये किलो असा दर असतनाही केळी उपलब्ध होत नाही. विक्रमी दर मिळत असला तरी घटत्या उत्पादनामुळे ना नफा ना तोटा अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
परराज्यातून केळीला मागणी
जळगाव, रावेल येथील केळीला अधिकतर मागणी ही उत्तर भारतामधून असते. यंदा या भागातील उत्पादनातही घट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर झालेला आहे. शिवाय केळीला बारमाही मागणी असते त्यामुळे हरियाणा ,मध्य प्रदेश ,काश्मीर येथून केळी घेण्यासाठी ट्रक दाखल झाले आहेत पण घटलेल्या उत्पादनामुळे 15 दिवस वेटींगवर थांबावे लागत आहे. व्यापारी वाढीव दराने केळी खरेदीला तयार आहेत मात्र, उत्पादनच नसल्याने शेतकरी आणि व्यापारी देखील हताश आहेत. 15 दिवस एकाच जागी ट्रक उभा असल्याने येथील मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम
गतवर्षी झालेल्या अवकाळीचा परिणाम आता उत्पादनावर आणि पिकावर दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे केळीवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. शिवाय नंतरच्या उन्हामध्ये बागा करपल्या होत्या. या सर्वांचा परिणाम केळी दरावर झाला आहे. जळगावप्रमाणेच उत्तर भारतामधील उत्पादनावरही असाच परिणाम झाला आहे. मात्र, आता वाढलेली मागणी आणि घटलेले उत्पादन याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/03203346/Kharif-Sowing-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/03174805/Parbahni-Sowing.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/02211101/New-Project-2022-07-02T154050.660.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/02153655/New-Project-2022-07-02T100637.668.jpg)
जळगावात पहिल्यांदाच अशी स्थिती
दरवर्षी जळगावातून इतरत्र राज्यात केळी नेली जाते. पण मागणी प्रमाणात असते. यंदा उत्पादनात घट झाली आणि मागणी वाढली. त्यामुळे ही स्थिती ओढावली आहे. ट्रान्सपोर्टसमोर 400 ते 500 वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जळगावात यंदा प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विक्रमी दर मिळत असला तरी उत्पादनातच घट झाल्याने शेतकरीही हताश आहे.