AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maize Crop: मका पिकामध्ये देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट अन् जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न

पिकांची उगवण झाली की त्याबरोबर किडीचा प्रादुर्भाव हे आता ठरलेलंच आहे. मात्र, आतापर्यंत ज्वारी आणि मका पिकावर आतापर्यंत किडीचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. यंदा वातावरणातील बदलामुळे या पिकांचीही सुटका झालेली नाही. मराठवाड्यासह खानदेशात मका या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Maize Crop: मका पिकामध्ये देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट अन् जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न
उन्हाळी हंगामातील पीक
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 06, 2022 | 10:54 AM
Share

जळगाव : पिकांची उगवण झाली की त्याबरोबर (Pest Infection) किडीचा प्रादुर्भाव हे आता ठरलेलंच आहे. मात्र, आतापर्यंत ज्वारी आणि मका पिकावर आतापर्यंत किडीचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. यंदा (Change Climate) वातावरणातील बदलामुळे या पिकांचीही सुटका झालेली नाही. मराठवाड्यासह खानदेशात (Maize Production ) मका या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे किडनाशकाची फवारणी करुनही पुन्हा 15 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव दोन महिन्याच्या पिकांमध्ये वाढलेला आहे. योग्य व्यवस्थापन करुनही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मकाची उगवण झाली की 15 दिवसांनीच फवारणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. यावर किटकनाशकांची फवारणी करुन पिकांची जोपसणा करण्यात आली होती. पण पुन्हा अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे उत्पादनावरील खर्चात वाढ झाली आहे.

लष्करी अळीचा असा करा बंदोबस्त

मका पीक जोमात असतानाच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे मका पिकाची पाने कुरतडली जात आहेत तर वाढीवर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मक्याच्या पोंग्यामध्ये किडनाशकाचे द्रावण टाकावे किंवा काही शेतकरी हे यामध्ये वाळू देखील टाकतात. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होतो. वाढत्या किडीमुळे पिकाचा अगदी सापळाच होऊ लागला आहे. भविष्यात उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांनी एकरी 5 ते 6 कामगंध सापळे लावून या किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शिवाय यावर निर्बंध लादण्यासाठी उपयुक्त किडनाशके आणि निविष्ठा अनुदानावर उपलब्ध करुन देणेही आता गरजेचे झाले आहे.

जनावरांच्या चाऱ्यााचाही प्रश्न

केवळ उत्पदानामुळेच नाही मका लागवडीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काहीअंशी मार्गी लागतो. त्यामुळे उन्हाळी हंगामात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र, वातावरणातील बदलामुळे लागवडीपासूनच पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे. याकरिता एकरी 300 ते 400 रुपये शेतकऱ्यांना खर्च येत आहे. असे असूनही दर 15 दिवासांनी किडीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे पण पिकाची वाढ खुंटल्याने भविष्यात चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Market: एवढंच राहिलं होत, एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून लूट

शेतकरी हताश : 50 पैशाला मेथीची जुडी विकण्यापेक्षा शेतकऱ्यांने निवडला हा मार्ग, ना वाहतूकीचा खर्च, ना ग्राहकांची मनधरणी

P.M.KISAN : पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल, आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली