AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी

'स्ट्रॉबेरी' म्हणलं की आपल्यासमोर येतो तो थंड हवेचा उत्तर भारतामधील भाग. कारण मराठवाडा अन् स्ट्रॉबेरीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही अशीच ती काय झालेली आपली भावना. मात्र, मराठवाड्यातील माळरानावर देखील स्ट्रॉबेरी या फळपिकाची बाग बहरू शकते हे उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावातील युवा शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

Success Story: दोन युवा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी, माळरानावर बहरली स्ट्रॉबेरी
उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावाच्या शिवारात दोन शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी फुलवली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 06, 2022 | 1:06 PM
Share

उस्मानबाद : (Strawberry) ‘स्ट्रॉबेरी’ म्हणलं की आपल्यासमोर येतो तो थंड हवेचा उत्तर भारतामधील भाग. कारण मराठवाडा अन् स्ट्रॉबेरीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही अशीच ती काय झालेली आपली भावना. मात्र, (Marathwada) मराठवाड्यातील माळरानावर देखील स्ट्रॉबेरी या फळपिकाची बाग बहरू शकते हे उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा गावातील युवा शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच गावचा तोरा आता वाढलेला आहे. काळाच्या ओघात आवश्यक ते बदल करुन इतर भागातही (Nutritious environment) पोषक वातावरण तयार करुन उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्ये तर बदल घडत आहेच पण उत्पादनात वाढ होण्याच्या अनुशंगानेही शेतकरी प्रयत्न करीत आहेत. केवळ प्रयत्नच नाही तर या गावातील दोघांनी या बागेतून लाखोंचे उत्पन्नही घेतले आहे. त्यामुळे फळबागांसाठी विशिष्ट वातावरणच आवश्यक आहे हा समज सचिन सुर्यवंशी आणि वैभव सुर्यवंशी यांनी मोडीत काढला आहे.

लागवड गुंठ्यामध्ये उत्पन्न लाखांत

सुरवातीच्या काळात अधिकचा आर्थिक फटका नको म्हणून सचिन सुर्यवंशी आणि वैभव सुर्यवंशी यांनी कमी क्षेत्रातच स्ट्रॉबेरीची लागवड केली. सचिन सुर्यवंशी यांनी 12 गुंठ्यात तर वैभव यांनी 17 गुंठ्यांत प्रयोग केला. दोघांचे मिळून पाऊन एकराचे क्षेत्र होते पण कष्ट आणि योग्य नियोजन यापेक्षा कित्येक पटीने अधिकचे. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केल्यानेच त्या दोघांना आतापर्यंत 6 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाय अजून काढणी सुरुच असून भविष्यात 2 लाखाचे उत्पन्न मिळेल असा आशावाद या दोघांनाही आहे.

कष्टाला योग्य नियोजनाची जोड…

लागवड करतानाच अपेक्षित उत्पादन घेण्याचा निर्धार या दोघांनी केला होता. शिवाय बांधावरुनच नियोजन नाही मल्चिंगपेपर अंथरण्यापासून ते आता तोडणी पर्यंत सर्व बाबींची काळजी घेतल्यानेच हे शक्य झाले आहे. कष्टापेक्षा नियोजन हेच महत्वाचे असल्याचे सचिन सुर्यवंशी यांनी सांगितले आहे तर हा सुरवातीचा टप्पा आहे. अजूनही स्ट्रॉबेरीला मागणी असून उर्वरीत काळात 2 लाखाचे उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद या दोघांनाही आहे.

नवनवीन प्रयोगच शेतकऱ्यांना तारतील

पारंपरिक शेतीमधून उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघणे मुश्किल आहे. दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बीत ज्वारी यापेक्षा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी हे वेगळा प्रयोगच करीत नाहीत. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. स्ट्रॉबेरी कमी क्षेत्रावर पण योग्य नियोजनाने लागवड केल्यास उत्पन्न हमखास असल्याचे सचिन सुर्यवंशी यांनी सांगतिले आहे. लागवडीपासून ते बाजारपेठेची माहिती घेऊनच हा प्रयोग करण्याचा सल्लाही त्यांनी इतरांना दिला आहे.

संबंधित बातम्या :

Maize Crop: मका पिकामध्ये देखील लष्करी अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट अन् जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न

Cotton Market: एवढंच राहिलं होत, एकीकडे उत्पादनात घट तर दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून लूट

शेतकरी हताश : 50 पैशाला मेथीची जुडी विकण्यापेक्षा शेतकऱ्यांने निवडला हा मार्ग, ना वाहतूकीचा खर्च, ना ग्राहकांची मनधरणी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं