AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गव्हाला चांगला दर मिळत असल्याने रब्बी हंगामात गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता

Buldhana : बुलढाण्यात खरीपाची लागवड तब्बल 7 लाख 40 हजार हेक्टरवर होणार आहे, सोयाबीन 4 लाख हेक्टर, कापूस 1 लाख 98 हजार हेक्टरवर लागवड, शेतकरी पुन्हा मशागतीच्या कामाल्याचे पाहायला मिळत आहे.

गव्हाला चांगला दर मिळत असल्याने रब्बी हंगामात गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता
buldhana farmer newsImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 27, 2023 | 10:28 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana news) जिल्ह्यात यंदा तब्बल सात लाख 40 हजार हेक्टरवर शेतकरी खरीपाची लागवड (kharif cultivation) करणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चार लाख हेक्‍टरवर सोयाबीन, एक लाख 98 हजार हेक्टरवर कापूस, 85 हजार हेक्टरवर तूर आणि इतर पिके घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मे महिना संपत आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कामाला सुरुवात केली आहे. बुलढाणा (buldhana farmer news) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे करताना दिसून येत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुबार पेरणी तर कधी अवकाळी अशा अस्मानी त्याचबरोबर सुलतानी संकटांना आव्हान देत पुन्हा एकदा शेतकरी आपल्या शेतात मोठ्या उमेदीने मेहनत घेताना पाहायला मिळत आहे.

रब्बी हंगामात गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गव्हाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आवक कमी झाली असल्याने गव्हाचे भाव वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, मात्र गव्हाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गव्हाला सध्या दोन हजार 140 ते दोन हजार 580 चा दर मिळत आहे. गव्हाच्या 963 या वाणाला पाच हजार 555 च्या चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे. तर गव्हाची आवक कमी आल्याने आणखीन भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. गव्हाला चांगला दर मिळत असल्याने रब्बी हंगामात गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड

नंदुरबार जिल्ह्यात मागील खरीप हंगामात कापसाला विक्रमी 12 हजार प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र मागील हंगामाच्या तुलनेत या हंगामात तब्बल सात हजार रुपये कापसाच्या भावात घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नसल्याने मार्चपर्यंत चालणारा हंगाम मे महिना संपण्यात आला तरी देखील सुरू आहे. नंदूरबार जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन हे खरीपाचे मुख्य पिके आहेत. गेल्या खरीपात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता, परंतु कापसाला चांगला भाव मिळेल आणि नुकसान भरपाई भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली होती, मात्र शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्णतः भंग झाल्या आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.