AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : आगामी 3 वर्षात वाढणार सोयाबीन, कापसाचे उत्पादन, राज्य सरकराचे धोरण काय ?

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे.

Kharif Season : आगामी 3 वर्षात वाढणार सोयाबीन, कापसाचे उत्पादन, राज्य सरकराचे धोरण काय ?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घट झाली आहे.
| Updated on: May 12, 2022 | 1:09 PM
Share

पुणे : उत्पादनाच्या दृष्टीने (Kharif Season) खरीप हंगाम महत्वाचा आहे. आणि यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा महत्वाचे पीक आहे. काळाच्या ओघात या दोन्ही पिकांच्या क्षेत्रफळात वाढ होत आहे. पण उत्पादनही वाढावे म्हणून आता (State Government) राज्य सरकराने एक वेगळे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आगामी 3 वर्षात या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढणार त्यादृष्टीने धोरण आखण्यात आले आहे. देशात प्रमुख पिकांच्या (Production) उत्पादकतेमध्येच घट आढळून येत आहे. त्यामुळे योग्य तंत्रज्ञानाचा वापर, शिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवण्यासाठी या विशेष कृती योजनेस 3 वर्षासाठी 1 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही मिळाली आहे.

या पिकांसाठी आहे तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे. शिवाय ज्या तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाची उत्पादकता कमी आहे त्यांची निवड करुन योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्पादनवाढीसाठी कोणते प्रयत्न होणार

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने कापूस आणि सोयाबीन ही पिके महत्वाची आहेत. त्यामुळे या पिकांचे उत्पादन वाढवायचे म्हणल्यावर विविध खते अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजूर निधी हा कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणासाठी वापरला जाणार आहे. तर 40 टक्के निधी मुल्यसाखळी म्हणजेच साठवणूक सुविधा, प्रक्रिया संच, क्लिंनिंग ग्रीडींग या बीबींसाठी वापरला जाणार आहे.

शेतकऱ्यांना करावा लागणार तंत्रज्ञानाचा वापर

उत्पादनवाढीसाठी तालुक्यातील शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात तेच तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचवले जाणार, गावनिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना पीक प्रात्याक्षिके करुन दाखविले जाणार आहेत.शेती शाळा, क्षेत्रीय भेटी या माध्यमातून उत्पादन तंत्रज्ञान पोहचविले जाणार आहेत.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.