AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : आगामी 3 वर्षात वाढणार सोयाबीन, कापसाचे उत्पादन, राज्य सरकराचे धोरण काय ?

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे.

Kharif Season : आगामी 3 वर्षात वाढणार सोयाबीन, कापसाचे उत्पादन, राज्य सरकराचे धोरण काय ?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात घट झाली आहे.
| Updated on: May 12, 2022 | 1:09 PM
Share

पुणे : उत्पादनाच्या दृष्टीने (Kharif Season) खरीप हंगाम महत्वाचा आहे. आणि यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा महत्वाचे पीक आहे. काळाच्या ओघात या दोन्ही पिकांच्या क्षेत्रफळात वाढ होत आहे. पण उत्पादनही वाढावे म्हणून आता (State Government) राज्य सरकराने एक वेगळे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आगामी 3 वर्षात या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढणार त्यादृष्टीने धोरण आखण्यात आले आहे. देशात प्रमुख पिकांच्या (Production) उत्पादकतेमध्येच घट आढळून येत आहे. त्यामुळे योग्य तंत्रज्ञानाचा वापर, शिवाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवण्यासाठी या विशेष कृती योजनेस 3 वर्षासाठी 1 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही मिळाली आहे.

या पिकांसाठी आहे तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पातच खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार खरिपातील कापूस, सोयाबीन, भुईमूग.सुर्यफूल, करडई, मोहरी आणि तीळ या तेलहबियांची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर मूल्यसाखळी विकासासाठी 3 वर्षासाठी विशेष कृषी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामधील 60 टक्के निधी हा केवळ कापूस आणि सोयाबीनवरच खर्ची केला जाणार आहे. शिवाय ज्या तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाची उत्पादकता कमी आहे त्यांची निवड करुन योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.

उत्पादनवाढीसाठी कोणते प्रयत्न होणार

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीच्या दृष्टीने कापूस आणि सोयाबीन ही पिके महत्वाची आहेत. त्यामुळे या पिकांचे उत्पादन वाढवायचे म्हणल्यावर विविध खते अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजूर निधी हा कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणासाठी वापरला जाणार आहे. तर 40 टक्के निधी मुल्यसाखळी म्हणजेच साठवणूक सुविधा, प्रक्रिया संच, क्लिंनिंग ग्रीडींग या बीबींसाठी वापरला जाणार आहे.

शेतकऱ्यांना करावा लागणार तंत्रज्ञानाचा वापर

उत्पादनवाढीसाठी तालुक्यातील शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात तेच तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे. कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहचवले जाणार, गावनिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना पीक प्रात्याक्षिके करुन दाखविले जाणार आहेत.शेती शाळा, क्षेत्रीय भेटी या माध्यमातून उत्पादन तंत्रज्ञान पोहचविले जाणार आहेत.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.