अबब! मुंबईत हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली

नुकत्याच अंधेरी येथील झालेल्या एका कार्यक्रमात हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीला विक्रमी भाव मिळताना दिसला. | Alphonso hapus mango

अबब! मुंबईत हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली
हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 9:09 AM

मुंबई: फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याला (Alphonso mango) यंदा बाजारपेठेत नेहमीप्रमाणे विक्रमी किंमत मिळताना दिसत आहे. आंब्याचा मोसम नुकताच सुरु झाला असून सध्या बाजारपेठेत अत्यंत मर्यादित प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत हापूस आंब्याला विक्रमी भाव मिळताना दिसत आहे. (Alphonso hapus mango price in Mumbai)

नुकत्याच अंधेरी येथील झालेल्या एका कार्यक्रमात हापूस आंब्याच्या 5 डझनच्या पेटीला विक्रमी भाव मिळताना दिसला. राजापूरमधील बाबू अवसरे या शेतकऱ्याच्या 5 डझन हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 1 लाख 8 हजारांचा विक्रमी भाव मिळाला आहे. हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.

शेतकऱ्यांना अडत्यांशिवाय आंबा थेट बाजारपेठेत विकण्याची सोय

कोकणातील (Kokan) हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.

कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन विकत घेतली.

2021 म्हणजे खरंच आनंद! खुडूसचा केशर आंबा कधी चाखायला मिळणार?

गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाप्रमाणे खुडूसच्या केशर आंब्याची बाजारपेठेत प्रचंड चर्चा असते. गेल्या हंगामात हवामान बदलामुळे राज्यात आंबा उत्पादनात घट झाली होती. तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांना आंब्याची गोडी चाखता आली नाही. पण यंदा सोलापूर जिल्ह्यातील खुडूस येथील शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी योग्य व्यवस्थापन आणि बागेची काळजी घेतल्याने केशर आंबा पोटभरून खायला मिळणार आहे. कारण या बागेतील आंब्याच्या झाडांना आताच मोठा मोहर आला आहे.

माळशिरस तालुक्यात माळरान भाग असल्याने अनेक ठिकाणी केशर आंब्याच्या बागांची लागवड केली जाते. खुडूसमध्ये सरगर कुटुंबाने सुध्दा अशाच एका शासकीय योजनेतून केशर आंबा बागेची लागवड केली.

खुडूसचा सरगर यांचा केशर आंबा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार होईल. त्यानंतर मे अखेर हा आंबा उपलब्ध असेल. सरगर यांची सहा एकर आंब्याची बाग आहे. एकरी 25 टन केशर आंबा मिळण्याचा अंदाज सरगर यांना आहे.

संबंधित बातम्या:

यंदाच्या हंगामातली पहिला हापूस आंबा पुणे मार्केटात दाखल, पेटीचा भाव 25 हजार रुपये

कोरोनाच्या भीतीनं हापूस आंब्याच्या परदेश निर्यातीला फटका, शेतकरी चिंतेत

2021 म्हणजे खरंच आनंद! खुडूसचा केशर आंबा कधी चाखायला मिळणार?

(Alphonso hapus mango price in Mumbai)

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.