कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर

आतापर्यंत वाहनात शेतीमाल भरला की, थेट विक्री झाल्यावर पट्टी आणायलाच जायचे ही भूमिका शेतकऱ्यांची होती. मात्र, यामध्ये आता बदल झाला आहे. कामगार आयुक्तांच्या एका निर्णयामुळे माल वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. कारण आता ज्याचा माल त्यानेच हमाली देणे बंधनकारक झाले आहे.

कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 11:02 AM

नाशिक : आतापर्यंत वाहनात शेतीमाल भरला की, थेट विक्री झाल्यावर पट्टी आणायलाच जायचे ही भूमिका शेतकऱ्यांची होती. मात्र, यामध्ये आता बदल झाला आहे. (Labour Commissione) कामगार आयुक्तांच्या एका निर्णयामुळे ( Transportation of agricultural produce) माल वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. कारण आता ज्याचा माल त्यानेच हमाली देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे हमाली, वराई आणि भराई ही वाहतूकदारांना द्यावयाची गरज नाही. त्यामुळे शेतकरी किंवा आडते यांच्यावरच हा भार येणार आहे.

काशामुळे झाला हा निर्णय?

गेल्या अनेक दिवसांपासून ज्याचा माल त्यानेच वाहतूक करण्याची मागणी कामगार वाहतूक संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. याविषयी कामगार आयुक्तांना निवेदनही देण्यात आले होते. शिवाय याची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबई येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा राज्यभरातील कामगार संघटनांनी दिला होता. मात्र, ही वेळ येण्याअगोदरच कामगार आयुक्त यांनी सर्व पदाधिकारी यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मास वाहतूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

अशी होणार अंमलबजावणी..

कामगार आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी याकरिता हे परिपत्रक 14 जानेवारी पर्यंत कामगार आयुक्त कार्यालय येथे पाठवावे लागणार आहे. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय ज्याचा माल त्यानेच हमाली अदा करायची हा निर्णय झाला असून राज्य शासनाच्या 2016 च्या परिपत्राकाची आता अंमलबजावणी करण्याची गरजच राहणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच हा बदल दिसणार आहे.

कशी असते हमाली?

मालाची वराई आणि भराई या दोन पध्दती असतात. यामध्ये वाहनातील माल काढायचा तर दुसरी शेतीमाल वाहनात भरायचा. आतापर्यंत जो मालाची भराई किंवा वराई करण्यासाठी गेला असेल त्यालाच हमाली अदा करावी लागत होती. पण आता यामध्ये बदल होणार आहे. हमाली देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर किंवा व्यापाऱ्यांवर येऊन ठेपणार आहे. वराईकरिता हमाली ही 60 रुपये टन अशी आहे. त्यामुळे आता ही रक्कम शेतकरी किंवा व्यापारी यांनाच द्यावी लागणार आहे. यामधून वाहतूकदारांची मात्र सुटका झाली आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून सुरु झालेला लढा आता मालमत्ता जप्तीपर्यंत, मराठवाड्यातील 20 कारखान्यांची काय आहे कहाणी?

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जमिनीची सुपिकता आहे महत्वाची, अशी घ्या शेतजमिनीचे काळजी

Summer Season: उन्हाळी हंगामाचे बदलते चित्र ‘हे’ आहे मुग लागवडीचे योग्य तंत्र

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.