AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर

आतापर्यंत वाहनात शेतीमाल भरला की, थेट विक्री झाल्यावर पट्टी आणायलाच जायचे ही भूमिका शेतकऱ्यांची होती. मात्र, यामध्ये आता बदल झाला आहे. कामगार आयुक्तांच्या एका निर्णयामुळे माल वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. कारण आता ज्याचा माल त्यानेच हमाली देणे बंधनकारक झाले आहे.

कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 11:02 AM
Share

नाशिक : आतापर्यंत वाहनात शेतीमाल भरला की, थेट विक्री झाल्यावर पट्टी आणायलाच जायचे ही भूमिका शेतकऱ्यांची होती. मात्र, यामध्ये आता बदल झाला आहे. (Labour Commissione) कामगार आयुक्तांच्या एका निर्णयामुळे ( Transportation of agricultural produce) माल वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक झळ बसणार आहे. कारण आता ज्याचा माल त्यानेच हमाली देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे हमाली, वराई आणि भराई ही वाहतूकदारांना द्यावयाची गरज नाही. त्यामुळे शेतकरी किंवा आडते यांच्यावरच हा भार येणार आहे.

काशामुळे झाला हा निर्णय?

गेल्या अनेक दिवसांपासून ज्याचा माल त्यानेच वाहतूक करण्याची मागणी कामगार वाहतूक संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. याविषयी कामगार आयुक्तांना निवेदनही देण्यात आले होते. शिवाय याची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबई येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा राज्यभरातील कामगार संघटनांनी दिला होता. मात्र, ही वेळ येण्याअगोदरच कामगार आयुक्त यांनी सर्व पदाधिकारी यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मास वाहतूक करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

अशी होणार अंमलबजावणी..

कामगार आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी याकरिता हे परिपत्रक 14 जानेवारी पर्यंत कामगार आयुक्त कार्यालय येथे पाठवावे लागणार आहे. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. शिवाय ज्याचा माल त्यानेच हमाली अदा करायची हा निर्णय झाला असून राज्य शासनाच्या 2016 च्या परिपत्राकाची आता अंमलबजावणी करण्याची गरजच राहणार नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच हा बदल दिसणार आहे.

कशी असते हमाली?

मालाची वराई आणि भराई या दोन पध्दती असतात. यामध्ये वाहनातील माल काढायचा तर दुसरी शेतीमाल वाहनात भरायचा. आतापर्यंत जो मालाची भराई किंवा वराई करण्यासाठी गेला असेल त्यालाच हमाली अदा करावी लागत होती. पण आता यामध्ये बदल होणार आहे. हमाली देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर किंवा व्यापाऱ्यांवर येऊन ठेपणार आहे. वराईकरिता हमाली ही 60 रुपये टन अशी आहे. त्यामुळे आता ही रक्कम शेतकरी किंवा व्यापारी यांनाच द्यावी लागणार आहे. यामधून वाहतूकदारांची मात्र सुटका झाली आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून सुरु झालेला लढा आता मालमत्ता जप्तीपर्यंत, मराठवाड्यातील 20 कारखान्यांची काय आहे कहाणी?

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जमिनीची सुपिकता आहे महत्वाची, अशी घ्या शेतजमिनीचे काळजी

Summer Season: उन्हाळी हंगामाचे बदलते चित्र ‘हे’ आहे मुग लागवडीचे योग्य तंत्र

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.