AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीनला माफक दर, पावसाने आवक घटली

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. मात्र, गुरुवारचे दर हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत. शिवाय उडीदाचे दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. गुरुवारी दुपारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 74011 क्विंटलचा दर मिळाला तर पोटगीतले दर हे 6700 एवढे होते. त्यामुळे दोन दिवसाच्या तुलनेत एक हजाराने दर वाढलेले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीनला माफक दर, पावसाने आवक घटली
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 23, 2021 | 4:14 PM
Share

लातूर : सोयाबीन दराच्या चढ-उतारामुळे नेमके बाजारात काय चित्र राहणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय लातूरच्या बाजारपेठेला मराठवाड्यात महत्व आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. मात्र, गुरुवारचे दर हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत. शिवाय उडीदाचे दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. गुरुवारी दुपारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 74011 क्विंटलचा दर मिळाला तर पोटगीतले दर हे 6700 एवढे होते. त्यामुळे दोन दिवसाच्या तुलनेत एक हजाराने दर वाढलेले आहेत.

खरिपातील नव्या सोयाबीनची आवक सुरु झाली की, दर घटण्यास सुरवात झाली होती. गेल्या आठवड्यात 11 हजार रुपयांवर गेलेले सोयाबीन थेट 5 हजारवर आले होते. त्यामुळे निसर्गाने तर पिकाचे नुकसानच झाले आहे पण बाजारात देखील दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. गुरुवारी सोयाबीनची आवक केवळ 3 हजार कट्ट्यांची होती. तर बुधवारी 5 हजार कट्टे सोयाबीन हे बाजारात दाखल झाले होते.

आवक कमी झाली की दर वाढत आहेत. शिवाय दोन दिवसापासून मराठवाड्यात पाऊस होत असल्याने काढणीही रखडली आहे. त्याचाच परिणाम हा आवकवर होत असल्याचे बालाजी जाधव यांनी सांगितले आहे. सोयाबीनचे दर हे कमी-अधिक होत असले तरी उडीदाचे दर हे स्थिर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून उडीदाला 7 हजार ते 7 हजार 400 चा दर मिळत आहे. पावसाने उडीद डागाळलेला असला तरी चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पैसे पडत आहेत.

हंगामाच्या सुरवातीला पेरणी झालेले सोयाबीन बाजारात दाखल होत आहे. तर उशीरा पेरणी झालेले सोयाबीनची काढणी कामे रखडलेली आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे दर काय राहतील यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून आहे.

दोन दिवसापासून आवक घटली

सोयाबीनला 10 हजाराचा दर होता. य दरम्यान, लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजाक कट्ट्यांची आवक होती. मात्र, सोमवारपासून दरात घट होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे बुधवारी 5 हजार तर गुरुवारी केवळ 3 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. शिवाय दोन दिवसापासून पाऊस असल्याने काढणी कामे रखडली परिणामी आवक ही घटलेली आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6500 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6570 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6400 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4900, सोयाबीन 7411, चमकी मूग 6750, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7422 एवढा राहिला होता.

शेतकऱ्यांनाही माफक दराचीच अपेक्षा

खरीपातील एकही पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. सोयाबीन हे मुख्य पीक असूम किमान सोयाबीनला 7 हजाराचा दर राहवा हा अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मध्यंतरी सलग दोन दिवत दर घसरल्याने चिंता वाढली होती पण गुरुवारी सोयाबीन हे 7 हजार 400 वर गेले होते. (Latur market price: Relief to farmers: Soyabean gets modest rate, urad prices stable )

संबंधित बातम्या :

काय सांगता ? यंदाच्या पावसाळ्यात लेंडी नदीच्या पूरामुळे 10 गावांचा 48 वेळा संपर्क तुटला

पांढरं सोनं दिसतंय पण काढता येईना, खानदेशातील शेतकऱ्यांची अवस्था

जिल्ह्याबाहेरील ऊसाला बीडच्या शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत कारणं?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ