AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?

यंदाच्या ऊस गाळप हंगामात दोन नवे अनुभव शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांच्या संचालकांना येताना दिसत आहे. क्षेत्र वाढले म्हणून उत्पादनात वाढ झाली असली दुसरीकडे याच वाढत्या क्षेत्रामुळे नियमित वेळात ऊसाचे गाळप होत नाही हे देखील तेवढेच खरे आहे. कारण अजूनही महाराष्ट्रातील 15 ते 20 टक्के क्षेत्रावरील ऊसाचे गाळप हे बाकी आहे.

ऊसतोडणी धिम्या गतीने तरीही साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच घोडदौड कायम..! कारखान्यांवर दबाव कशाचा?
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 27, 2022 | 5:12 AM
Share

पुणे : यंदाच्या (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगामात दोन नवे अनुभव शेतकऱ्यांना आणि (Sugar Factory) साखर कारखान्यांच्या संचालकांना येताना दिसत आहे. क्षेत्र वाढले म्हणून उत्पादनात वाढ झाली असली दुसरीकडे याच वाढत्या क्षेत्रामुळे नियमित वेळात ऊसाचे गाळप होत नाही हे देखील तेवढेच खरे आहे. कारण अजूनही (Maharashtra) महाराष्ट्रातील 15 ते 20 टक्के क्षेत्रावरील ऊसाचे गाळप हे बाकी आहे. ही एक बाजू असली तरी साखर उत्पादनात महाराष्ट्राने यंदा उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशापेक्षा तब्बल 27 लाख टन साखरेचे अधिकचे उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंतचे हे चित्र असले तरी आगामी काळात महाराष्ट्रातीलच साखर कारखान्यांचे गाळप सुरु राहणार आहे. त्यामुळे उत्पादन अधिक वाढेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उत्पादन वाढूनही धास्ती कायम

यंदा पोषक वातावरणामुळे ऊसाचे उत्पादन वाढलेले आहे. महाराष्ट्रात 197 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप झाले असले अजूनही ऊस हा फडातच आहे. त्यामुळे उर्वरीत ऊसाचे गाळप होणार की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील ऊसतोडीचा प्रश्न कायम आहे. उत्पादन वाढले ही एक बाजू असली तरी कारखाना क्षेत्रातल्या ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करु नयेत असे पत्रच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी संचालकांना दिले आहेत. त्यामुळे तोड होणार असली तरी ती लांबणीवर पडत असल्याने उत्पादनात घट हे कोणी टाळू शकणार नाही.

महाराष्ट्रातील साखर उत्पादनाची स्थिती

यंदा राज्यातील 197 साखर कारखान्यांच्या माध्यमातून गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना राज्यात 86 लाख 15 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीपेक्षा 10 लाख टनाने साखरेचे उत्पादन वाढले असले तरी यंदा 10 साखर कारखान्यांची संख्या वाढली हे ही तेवढेच खरे आहे. असे असूनही वेळेत ऊसाची तोड झालेली नाही. त्यामुळे यंदा लागलीच कारखान्यांचे गाळप बंद होणार नाही तर टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे संकेत साखर आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

यामुळे रखडली ऊसाची तोड..

काळाच्या ओघात ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर वाढलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर हे प्रमाण अधिक वाढले आहे. मात्र, ऊसतोडणीचे यंत्र हे अधिकचे क्षेत्र असलेल्या भागातच वापरता येते. शिवाय लगत ऊसाचे क्षेत्र असले तर ते अधिक सोयीचे होते. पण पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात शेत जमिनीत चढ-उतार आहे. त्यामुळे मजूरांशिवाय पर्याय नाही. यंत्र सामुग्रीमध्ये वाढ झाली असली तरी त्याचा वापर पाहिजे त्या प्रमाणात झाला नसल्याने तोड ही रखडलेली आहे.

संबंधित बातम्या :

Banana : केळी निर्यात लांबणीवर, आता दरावर काय होणार परिणाम?

Success Story :  शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!

यंदाचं काय घेऊन बसलावं, 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत गंगाखेडचे शेतकरी, आता उपोषणाचे अस्त्र

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या