AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरेचं विक्रमी उत्पादन, कारखान्यांसमोर आता विक्रीचं आव्हान, सरकारची भूमिका काय?

. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 1053.44 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे. Maharashtra sugar mills

साखरेचं विक्रमी उत्पादन, कारखान्यांसमोर आता विक्रीचं आव्हान, सरकारची भूमिका काय?
Sugar cane
| Updated on: Apr 28, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई: ऊस आणि साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर समजलं जातं. राज्यात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 2020-21 च्या गळीत हंगामात 1004.71 लाख टन उसाचं गाळप केलं आहे. यामध्ये 90 खासगी आणि 95 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यापूर्वी 2017-18 मध्ये राज्यात सर्वाधिक 954 लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 1053.44 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे. 18 साखर कारखान्यांकडून गाळप सुरु असल्याची माहिती आहे. (Maharashtra sugar mills produce 1053 lakh quintal sugar during this season)

कोल्हापूर आणि पुणे आघाडीवर

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर आणि पुणे जिल्हे आघाडीवर आहेत. कोल्हापूर आणि पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक ऊसाचं क्षेत्र आहे. येथील कारखान्यांकडून राज्यातील साखरेच्या उत्पादनापैकी जवळपास 50 टक्के उत्पादन होतं.

औरंगाबाद ते नागपूरमध्येही साखरेचं उत्पादन

महाराष्ट्रातील औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि अमरावतीमध्येही साखर कारखाने आहेत. या परिसरातील कारखान्यांनी 197 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन कलें आहे. राज्याच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत 19 टक्के साखर या भागातून उत्पादित केली गेलीय. या परिसरात एकूण 53 साखर कारखाने चालू आहेत. अहमदनगरमध्ये 10 आणि औरंगाबादमध्ये 11 साखर कारखाने सुरु आहेत.

साखरेला कमी दर मिळतोय?

साखर कारखान्यांसमोर साखरेच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं विकावी लागतेय. नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडच्यानुसार किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरानं साखर विक्री केली जातेय. सध्याचा एक क्विंटल साखर 3100 रुपयांना विकली जातेय. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साखरेचा अतिरिक्त साठा विक्री करण्यासाठी 60 लाख टन साखरेची निर्यात करणार असल्याची माहिती दिली होती. राज्य आणि केंद्र सरकारनं साखर कारखान्यांना इथेनॉल, गुळ आणि इत्यादी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत दमदार भाषण, वाचा 10 महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे

Weather Alert: राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबई वेधशाळेचा इशारा इशारा, सटाणा, पिंपरी चिंचवडला झोडपलं

(Maharashtra sugar mills produce 1053 lakh quintal sugar during this season)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.