AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Banana Crop : पीक पध्दतीमध्ये बदलापेक्षा उपाययोजना गरजेच्या, जळगावात केळी नुकसानीवरुनही ‘राजकारण’

जळगाव जिल्ह्यात केळीचे क्षेत्र अधिक आहे. शिवाय केळीला आता फळाचा दर्जा मिळाल्यानंतर क्षेत्र वाढतच आहे. केळीची वाढ होत असताना अवकाळी पाऊस आणि आता तोडणीच्या दरम्यान मान्सूनचा झटका यामुळे दरवर्षी नुकसान हे ठरलेलेच आहे. जिल्ह्यात सर्वत्र केळीची तोडणी आणि व्यापाऱ्यांकडून सौदे होत असतानाच गेल्या 5 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य आहे.

Banana Crop : पीक पध्दतीमध्ये बदलापेक्षा उपाययोजना गरजेच्या, जळगावात केळी नुकसानीवरुनही 'राजकारण'
पावसामुळे जळगाव जिल्ह्यात केळी बागांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 15, 2022 | 9:22 AM
Share

जळगाव : राज्यात अजूनही मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय झालेला नाही. मात्र, केळी पिकाचे मुख्य आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या (Banana Garden) केळी बागा आडव्या झाल्या आहेत. केळी नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसान टाळायचे असेल तर शेतकऱ्यांनी (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला होता. आता यावरुनच राजकारण सुरु झाले आहे. केळीमुळे जळगावची वेगळी ओळख आहे. त्यामुळे पीक बदलण्यापेक्षा शेतकऱ्यांना (Measures) उपाययोजना राबवल्या तर नुकसानही टळणार आहे आणि जिल्ह्याची ओळखही पुसणार नसल्याचा टोला खा. उन्मेश पाटील यांनी दिला आहे. केळी नुकसानीनंतर आता पीक पाहणी आणि आश्वासनांचा पाऊस पडत आहे. पण ज्या शेतकऱ्यांची उभे पीक आडवे झाले त्यांना गरज आहे ती मदतीची. त्यामुळे पाहणी, पंचनाम्यांचेही आदेश आले आता मदत मिळणार का हेच पहावे लागणार आहे.

पावसासह वादळी वाऱ्याने नुकसान

जळगाव जिल्ह्यात केळीचे क्षेत्र अधिक आहे. शिवाय केळीला आता फळाचा दर्जा मिळाल्यानंतर क्षेत्र वाढतच आहे. केळीची वाढ होत असताना अवकाळी पाऊस आणि आता तोडणीच्या दरम्यान मान्सूनचा झटका यामुळे दरवर्षी नुकसान हे ठरलेलेच आहे. जिल्ह्यात सर्वत्र केळीची तोडणी आणि व्यापाऱ्यांकडून सौदे होत असतानाच गेल्या 5 दिवसांपासून पावसामध्ये सातत्य आहे. एवढेच नाही तर वादळी-वाऱ्यामुळे केळी बागा ह्या आडव्या होत आहेत. त्यामुळे एकरी लाखोंचा खर्च करुनही पदरी काय पडणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे.

केळी पिकावरुन राजकीय मतभेद

पावसामुळे केळी बागांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी लोकप्रतिनिधी आता बांधावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केळीची पाहणी करुन शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता केळीला पर्याय शोधणे गरजेचे आहे. शिवाय हे नुकसान काही यंदाचेच नाही गेल्या 4 वर्षापासून होत असल्याने त्यांनी हा सल्ला दिला होता. आता त्यावर खा. उन्मेश पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे. पीकच बदलण्यापेक्षा योग्य त्या उपाययोजना राबवून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आठ दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करणेही गरजेचे असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना अपेक्षा मदतीची

केळी जोपासताना सततच्या अवकाळी पावसामुळे उत्पादनावरील खर्च तर वाढला आहेच पण काढणीच्या दरम्यान चिंता होती ती दराची. कारण केळीला 300 ते 400 रुपये क्विंटल असा दर होता. आता कुठे दर वाढत असताना वादळी वाऱ्यांने बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही राजकारण न होता पंचनामे करुन प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांची आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ