AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लक्षात असू द्या’ कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल

पंचनाम्यादरम्यान पिक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे किती टक्के नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना काही माहिती सांगत नाहीत तर बांधावरून पंचनामा करुन कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांची सही घेतात. याचा अर्थ हा पंचनामा आम्हाला मंजूर असून यापोटी जी रक्कम मिळणार याच्याशी सहमती दर्शवितो. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी माहिती झाल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या न करण्याचा सल्ला (Nanded) हिमायत नगरचे आ. माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शिवाय विमा कंपनीचा कारभार कशा पध्दतीने चालतो हे सांगताना त्यांची जीभही घसरली.

'लक्षात असू द्या' कोऱ्या कागदावर सह्या म्हणजे फसवणूक, आ. माधवराव पाटलांकडून विमा कंपन्यांच्या कारभाराची पोलखोल
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 04, 2021 | 10:50 AM
Share

नांदेड : पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे नुकसान झालेल्या पीकांचा पंचनामा करीत आहेत. पण मदत करण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे पंचनामा (Panchnama) झाला म्हणजे मदत मिळणारच असे नाही. पंचनाम्या दरम्यान पिक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे किती टक्के नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांना काही माहिती सांगत नाहीत तर बांधावरून पंचनामा करुन कोऱ्या कागदावर शेतकऱ्यांची सही घेतात. याचा अर्थ हा पंचनामा आम्हाला मंजूर असून यापोटी जी रक्कम मिळणार याच्याशी सहमती दर्शवितो. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी माहिती झाल्याशिवाय कोणत्याही कागदावर सह्या न करण्याचा सल्ला (Nanded) हिमायत नगरचे आ. माधवराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शिवाय विमा कंपनीचा कारभार कशा पध्दतीने चालतो हे सांगताना त्यांची जीभही घसरली.

मध्यंतरी पावसाने खरीपातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसा झाले आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून लोकप्रतिनीधीसह विमा कंपनीचे प्रतिनिधी हे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्याची भरपाई ही मिळावी अशी मानसिकता ही विमा कंपनीची नाही. त्यामुळे पंचनामा केल्याचे दाखवत हे विमा प्रतिनीधी शेतकऱ्यांना नुकसानीसंदर्भात योग्य ती माहीती देत नाहीत.

शिवाय कोऱ्या कागदावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेऊन केलेल्या पंचनाम्याला शेतकऱ्याची सहमती असल्याचे सांगतात. यामुळे मदती जाहीर करण्याच्या दरम्यान, प्रत्यक्षात झालेले नुकसान हे अधिकचे असते पण कोऱ्या कागदावर सही केल्याने विमा कंपनी मनमानी कारभार करून कमीचे नुकसान दाखवते. यावेळी आ. पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून असाच प्रकार घडत असून अधिकचे नुकसान असूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कमी नुकसानभरपाऊ मिळत आहे.

अन् आमदारांची जीभ घसरली…

विमा कंपन्यांचा अजब कारभार आहे. भरलेल्या विमा रकमेपोटी शेतकऱ्यांना कधीच वेळेवर पैसे मिळालेले नाहीत. विमा कंपन्यांच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत असताना आ. माधवराव पाटील यांचा जीभेवरील ताबा सुटला आणि हरामखोर म्हणत विमा कंपन्यांचा कारभार कसा चालतो हे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

गतवर्षीच्या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतिक्षाच

गतवर्षीही परतीच्या पावसामुळे हदगाव परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. सोयाबीन, उडीद हे पाण्यात होते. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला होता. मात्र, विमा कंपन्यांचा मनमाही कारभारचा सामना शेतकऱ्यांना अद्यापही करावा लागत आहे. वर्ष पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा तर ही चूक विमा कंपनीकडून झाली तर भर रस्त्यावरच हिशोब घेतला जाणार असल्याचा इशारा आ. माधवराव पाटील यांनी दिला आहे.

विमा कंपनी प्रतिनीधी बांधावरच

शेतामध्ये पावसाचे पाणी अजूनही साचलेले आहे. त्या पाण्यात जाऊन शेतकऱ्यांनी पंचनामे व्हावेत याकरिता दावे केले. मात्र, विमा कंपनीचे प्रतिनीधी नियमानुसार नुकसानीची टक्केवारी ठरवत नाहीत. बांधावरुनच अंदाजे नुकसान ठरवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

पंचनाम्याची कशी असते प्रक्रीया

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तक्रार सर्वप्रथम शेतकऱ्यांना द्यावी लागते. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागातील कृषी सहायक, मंडळ अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. शेतकऱ्याच्या पिकाच्या नोंदीनुसार पंचनामे केले जातात. तर प्रत्येक एकरावरची पाहणी न करता नुकसान झालेल्या पिकाचे निकष हे त्या गटाकरीता लागू केले जातात. (Mla advises farmers on governance of crop insurance companies, don’t let them be cheated: A. Madhavrao Patil)

संबंधित बातम्या :

…म्हणून उडदाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांनो मालाची काळजी घ्या अन् योग्य दर मिळवा

छत्तीसगडच्या शेतकऱ्याने नापीक जमिनीत आणली हिरवळ, आज 500 लोकांना रोजगार

‘गोऱ्हा नाही कालवडच होणार’, गाईचं गर्भाशयच ट्रान्सप्लांट करण्याचा गडकरींचा मंत्र, महाराष्ट्रासह देश बदलणार, काम सुरु

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक