AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईची बाग उद्धवस्त, पिके कापण्याच्या घटना वाढल्या, पोलिसांच्या कारवाईची गरज

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात तीन एकरात लागवड केलेली पपईची 1600 परिपक्व झाडे अज्ञात माथेफिरूने कापून घटना घडली आहे.

रक्ताचं पाणी करुन जगवलेली पपईची बाग उद्धवस्त, पिके कापण्याच्या घटना वाढल्या, पोलिसांच्या कारवाईची गरज
नंदुरबार पपई बाग
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 11:16 AM
Share

नंदूरबार: जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात तीन एकरात लागवड केलेली पपईची 1600 परिपक्व झाडे अज्ञात माथेफिरूने कापून घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने एकच आक्रोश केला आहे. दहा दिवसांपूर्वी याच क्षेत्रातील पपईची 50 च्या जवळपास झाडे कापली गेली होती. त्यानंतर एकाच रात्री दोन एकरातील पावणेदोन हजार झाडे कापली गेली आहेत. अज्ञात माथेफिरूंच्या या कृतीमुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. याप्रकरणी तपास होऊन कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

रक्ताचं पाणी करुन जगवलेल्या बागेचं होत्याचं नव्हतं

दत्तू रोहिदास पाटील यांच्या बोरद शिवारातील शेतात सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दत्तू पाटील यांना तीन एकरात पपईची लागवड केली आहे. सकाळी मजुरांच्या सोबत शेतात गेले असता पपईची झाडांची धारदार शस्त्राचा सहाय्याने कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अगोदरच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करुन जगवलेल्या पपईच्या बागा अज्ञात माथेफिरू कापून टाकत असल्याने शेतकरी अडचणीत आलेत. पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. मात्र, याकडे लक्ष दिलं जात नसल्याचेही समोर आले आहे.या भागात पिके कापून फेकण्याचा घटना मध्ये वाढ झाली असून माथेफिरू चा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 तापी नदी पात्रात मासेमारी साठी मोठी गर्दी

गेल्या आठवड्यात मध्यप्रदेश आणि जळगाव मध्ये दमदार पाऊस झाल्याने हातनूर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. आता प्रकाशा बॅरेज चे दरवाजे बंद करण्यात आल्याने नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी केली आहे. रोजगार नसल्याने स्थानिक तरुण मासेमारीकडे वळले असल्याचे चित्र सध्या तरी जिल्ह्यात दिसून येत आहे. मासेमारी तून थोड्याफार प्रमाणात रोजगार प्राप्त होत असल्याने तरुणांची गर्दी नदीपात्रात दिसून येत आहे.

इतर बातम्या:

बैलगाडी शर्यत आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार, सुनील केदार यांची माहिती

गोंदियात महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय बागायती शेती, देशी-विदेशी भाजीपाला लागवड

Nandurbar Taloda Village Borad  farmer Dattu Patil Papaya Farm demolished by Unknown person farmer demanded Probe

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.