सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?

नेपाळनं जुलै 2020 ते एप्रिल 2021 मध्ये भारताला 2 लाख 15 हजार टन सोयाबीन तेलाची तर 3 हजार टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे. Nepal export Soybean Palm oil

सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?
खाद्यतेलावर स्टॉक मर्यादा नियम लागू, पण किमती कमी होण्यास लागेल वेळ
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 4:16 PM

नवी दिल्ली: भारतात सध्या खाद्यतेलाच्या किमतींनी मोठा उच्चांक गाठला आहे. सोयाबीन सोयाबीन तेलाची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सध्या सोयाबीन तेलाची चर्चा नेपाळमुळे होत आहे. नेपाळ सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन तेल आणि पाम तेलाची निर्यात करत आहे. मात्र नेपाळमध्ये सोयाबीनची शेती केली जात नाही मग नेपाळ भारताला सोयाबीन तेल कसं पाठवत आहे. (Nepal export Soybean and Palm oil to India but Indian traders facing many problems )

एका करारानुसार नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या शेजारील देशांना भारत सरकारने काही वस्तू भारतीय बाजारात विकण्यास मंजुरी दिलेली आहे. दक्षिण आशियाई शुल्क मुक्त व्यापार क्षेत्र स्थापन करण्यात आले आहे. या कराराचा नेपाळद्वारे दुरुपयोग केला जात असल्याचं तज्ञांचे मत आहे.

भारतीय व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

नेपाळ आणि बांगलादेश मधील व्यापारी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि पाम तेल बाहेरून आयात करून भारतात निर्यात करत आहेत. भारतीय व्यापाऱ्यांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जे भारतीय व्यापारी सोयाबीन तेलाची आयात करतात त्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. याशिवाय भारत सरकारला देखील जवळपास 1200 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

नेपाळ आणि बांग्लादेशकडून परदेशातून आयात

नेपाळ आणि बांगलादेशला त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तू भारतीय बाजारात विनाशुल्क विकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र, दोन्ही देशांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. दोन्ही देश दुसऱ्या देशातून सोयाबीन तेल आणि पाम तेल आयात करुन भारतात निर्यात करत आहेत. परिणामी भारतीय व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नेपाळ आणि बांगलादेश मलेशिया आणि इंडोनेशियातून पाम तेल तर सोयाबीन तेल ब्राझील आणि अर्जेंटिना या देशातून आयात करत आहेत.

भारतात पाम तेल आणि सोयाबीन तेलावर किती शुल्क?

भारतीय व्यापारी क्रूड पाम तेल ज्यावेळेस आयात करतो त्यावेळेस त्याला एका लिटर 32 रुपये कर द्यावा लागतो. सोयाबीन तेलावर त्याला 42 रुपये शुल्क द्यावं लागतं. मात्र, नेपाळमधून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलावर कोणताही कर लागत नाही. आकडेवारीनुसार नेपाळनं जुलै 2020 ते एप्रिल 2021 मध्ये भारताला 2 लाख 15 हजार टन सोयाबीन तेलाची तर 3 हजार टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update: महाराष्ट्रात आजही पावसाची दमदार बॅटिंग? हवामान विभागानं काय सांगितलं?

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा

(Nepal export Soybean and Palm oil to India but Indian traders facing many problems )

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.