AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?

नेपाळनं जुलै 2020 ते एप्रिल 2021 मध्ये भारताला 2 लाख 15 हजार टन सोयाबीन तेलाची तर 3 हजार टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे. Nepal export Soybean Palm oil

सोयाबीन शेती न करणारा नेपाळ चर्चेत, भारतात 2 लाख टन तेल निर्यात, नेमकं प्रकरण काय?
खाद्यतेलावर स्टॉक मर्यादा नियम लागू, पण किमती कमी होण्यास लागेल वेळ
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 4:16 PM
Share

नवी दिल्ली: भारतात सध्या खाद्यतेलाच्या किमतींनी मोठा उच्चांक गाठला आहे. सोयाबीन सोयाबीन तेलाची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सध्या सोयाबीन तेलाची चर्चा नेपाळमुळे होत आहे. नेपाळ सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन तेल आणि पाम तेलाची निर्यात करत आहे. मात्र नेपाळमध्ये सोयाबीनची शेती केली जात नाही मग नेपाळ भारताला सोयाबीन तेल कसं पाठवत आहे. (Nepal export Soybean and Palm oil to India but Indian traders facing many problems )

एका करारानुसार नेपाळ आणि बांगलादेश यासारख्या शेजारील देशांना भारत सरकारने काही वस्तू भारतीय बाजारात विकण्यास मंजुरी दिलेली आहे. दक्षिण आशियाई शुल्क मुक्त व्यापार क्षेत्र स्थापन करण्यात आले आहे. या कराराचा नेपाळद्वारे दुरुपयोग केला जात असल्याचं तज्ञांचे मत आहे.

भारतीय व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

नेपाळ आणि बांगलादेश मधील व्यापारी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि पाम तेल बाहेरून आयात करून भारतात निर्यात करत आहेत. भारतीय व्यापाऱ्यांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जे भारतीय व्यापारी सोयाबीन तेलाची आयात करतात त्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. याशिवाय भारत सरकारला देखील जवळपास 1200 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

नेपाळ आणि बांग्लादेशकडून परदेशातून आयात

नेपाळ आणि बांगलादेशला त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तू भारतीय बाजारात विनाशुल्क विकण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र, दोन्ही देशांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे. दोन्ही देश दुसऱ्या देशातून सोयाबीन तेल आणि पाम तेल आयात करुन भारतात निर्यात करत आहेत. परिणामी भारतीय व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नेपाळ आणि बांगलादेश मलेशिया आणि इंडोनेशियातून पाम तेल तर सोयाबीन तेल ब्राझील आणि अर्जेंटिना या देशातून आयात करत आहेत.

भारतात पाम तेल आणि सोयाबीन तेलावर किती शुल्क?

भारतीय व्यापारी क्रूड पाम तेल ज्यावेळेस आयात करतो त्यावेळेस त्याला एका लिटर 32 रुपये कर द्यावा लागतो. सोयाबीन तेलावर त्याला 42 रुपये शुल्क द्यावं लागतं. मात्र, नेपाळमधून भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलावर कोणताही कर लागत नाही. आकडेवारीनुसार नेपाळनं जुलै 2020 ते एप्रिल 2021 मध्ये भारताला 2 लाख 15 हजार टन सोयाबीन तेलाची तर 3 हजार टन कच्च्या तेलाची निर्यात केली आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update: महाराष्ट्रात आजही पावसाची दमदार बॅटिंग? हवामान विभागानं काय सांगितलं?

PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा

(Nepal export Soybean and Palm oil to India but Indian traders facing many problems )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.