AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Samman Nidhi : लाखो शेतकऱ्यांना जबर धक्का, सन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार नाहीत; कारण काय?

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. असे असताना टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे.

PM Kisan Samman Nidhi : लाखो शेतकऱ्यांना जबर धक्का, सन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार नाहीत; कारण काय?
pm kisan samman nidhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 7:14 PM
Share

PM Kisan Samman Nidhi : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत एकूण तीन टप्प्यांत केली जाते. प्रत्येक टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. आता देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता कधी मिळतो, याची वाट पाहात आहेत. असे असतानाच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहेत. त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा 22 वा हप्ता मिळणार नाही.

लाखो शेतकऱ्यांना बसणार फटका

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही माहिती समोर आली आहे. या योजनेला पारदर्शी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेली लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अपडेट केली जाते. या योजनेच्या अधिकृत पोर्टलनुसार काही शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकली आहे. शेतकऱ्यांचे नाव हटवण्याची एकूण दोन प्रमुख कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 20219 नंतर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतलेली आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे 1 फेब्रुवारी 2019 रोजीच्या अगोदर जमीन नव्हती त्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली जात आहेत. यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले, त्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे नाव यादीतून का हटवले?

या यादीतून नाव काढून टाकण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्या शेतकरी कुटुंबात या योजनेचा फायदा एकापेक्षा जास्त लोक घेत आहेत, त्या कुटुंबातील शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील पती-पत्नी, एक अल्पवयीन व्यक्ती तर एक प्रौढ व्यक्ती या योजनेचा लाभ घेताना आढळल्या आहेत. त्यामुळे अशा लोकांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.

22 वा हप्ता नेमका कधी मिळणार?

केंद्राच्या कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार काही शेतकऱ्यांच्या अर्जाबाबत, कागदपत्रांबाबत संदिग्धता आह, त्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत आता रोखण्यात आलेलीी आहे. जोपर्यंत संबंधित शेतकरी प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करत नाही, तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, यावेळी 22 व्या हप्त्याचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत आपले नाव आहे का? हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन