AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Samman Nidhi : लाखो शेतकऱ्यांना जबर धक्का, सन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार नाहीत; कारण काय?

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. असे असताना टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे.

PM Kisan Samman Nidhi : लाखो शेतकऱ्यांना जबर धक्का, सन्मान निधीचे 2000 रुपये मिळणार नाहीत; कारण काय?
pm kisan samman nidhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 7:14 PM
Share

PM Kisan Samman Nidhi : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत एकूण तीन टप्प्यांत केली जाते. प्रत्येक टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. आता देशभरातील शेतकरी या योजनेअंतर्गत 22 वा हप्ता कधी मिळतो, याची वाट पाहात आहेत. असे असतानाच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आली आहेत. त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा 22 वा हप्ता मिळणार नाही.

लाखो शेतकऱ्यांना बसणार फटका

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही माहिती समोर आली आहे. या योजनेला पारदर्शी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेली लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अपडेट केली जाते. या योजनेच्या अधिकृत पोर्टलनुसार काही शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकली आहे. शेतकऱ्यांचे नाव हटवण्याची एकूण दोन प्रमुख कारणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 20219 नंतर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतलेली आहे, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे 1 फेब्रुवारी 2019 रोजीच्या अगोदर जमीन नव्हती त्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली जात आहेत. यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले, त्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे नाव यादीतून का हटवले?

या यादीतून नाव काढून टाकण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण आहे. ज्या शेतकरी कुटुंबात या योजनेचा फायदा एकापेक्षा जास्त लोक घेत आहेत, त्या कुटुंबातील शेतकऱ्याचे नाव लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील पती-पत्नी, एक अल्पवयीन व्यक्ती तर एक प्रौढ व्यक्ती या योजनेचा लाभ घेताना आढळल्या आहेत. त्यामुळे अशा लोकांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.

22 वा हप्ता नेमका कधी मिळणार?

केंद्राच्या कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार काही शेतकऱ्यांच्या अर्जाबाबत, कागदपत्रांबाबत संदिग्धता आह, त्या शेतकऱ्यांची आर्थिक मदत आता रोखण्यात आलेलीी आहे. जोपर्यंत संबंधित शेतकरी प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन करत नाही, तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, यावेळी 22 व्या हप्त्याचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत आपले नाव आहे का? हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.