AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : पावसाने साधले मृगाचे मुहूर्त, कांदा उत्पादकांचे मात्र नुकसानच

गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वाऱ्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास 700 क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे.

Nashik : पावसाने साधले मृगाचे मुहूर्त, कांदा उत्पादकांचे मात्र नुकसानच
पहिल्याच पावसामध्ये साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 10:23 AM
Share

मालेगाव : उशीरा का होईना (North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मृगाचे मुहूर्त मान्सूनने साधले असून हा पहिला पाऊस कहीं खुशी..कही गम असाच ठरला आहे. (Kharif Season) खरिपासाठी हा पाऊस पोषक असला तरी विसापूर एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दरामुळे (Onion Crop) कांदा उत्पादक अडचणीत असताना आता शुक्रवारी झालेल्या पावसामुळे कांदा शेडवरील पत्रे उडून गेल्याने तब्बल 700 क्विंटल कांदा हा भिजला आहे. त्यामुळे पहिल्या पावसाची उत्सुकता तर होतीच पण अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामांना वेग येणार आहे. तर वेळेत खरिपाच्या पेरण्या होतील असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

दुष्काळात तेरावा, पदरी नुकसानच

गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वाऱ्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास 700 क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतले चित्र बदलत असताना आता 700 क्विंटल कांदा भिजल्याने हे नुकसान कसे भरुन काढले जाणार हा प्रश्नच आहे.

उशीरा का होईना मुहूर्त साधले आता पेरणीचे वेध

यंदा वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून नियमित वेळेही बरसला नाही. त्यामुळे खरिपावर चिंतेचे ढग होते. हवामान विभागाने वेळोवेळी अंदाज वर्तवले पण प्रत्यक्षात उत्तर महाराष्ट्रात मृगातच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता खरिपपूर्व मशागतींच्या कामांना वेग येणार असून पावसामध्ये सातत्य राहिल्यास नियमित वेळी पेरण्यादेखील होतील असा अंदाज आहे. शिवाय पेरणीची पूर्ण तयारी झाली असली तर 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावर अन् जमिनीत ओलावा असल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

कळवण तालुक्यासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. हंगामातील पहिला पाऊस खरिपासाठी पोषक तर राहिलाच पण यामुळे नुकसानही अधिक झाले आहे. विसापूर येथे शेतकरी बारकू गोपू सोनवणे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वादळी वाऱ्यामुळे कांदा शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.