AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : पावसाने साधले मृगाचे मुहूर्त, कांदा उत्पादकांचे मात्र नुकसानच

गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वाऱ्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास 700 क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे.

Nashik : पावसाने साधले मृगाचे मुहूर्त, कांदा उत्पादकांचे मात्र नुकसानच
पहिल्याच पावसामध्ये साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 10:23 AM
Share

मालेगाव : उशीरा का होईना (North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मृगाचे मुहूर्त मान्सूनने साधले असून हा पहिला पाऊस कहीं खुशी..कही गम असाच ठरला आहे. (Kharif Season) खरिपासाठी हा पाऊस पोषक असला तरी विसापूर एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दरामुळे (Onion Crop) कांदा उत्पादक अडचणीत असताना आता शुक्रवारी झालेल्या पावसामुळे कांदा शेडवरील पत्रे उडून गेल्याने तब्बल 700 क्विंटल कांदा हा भिजला आहे. त्यामुळे पहिल्या पावसाची उत्सुकता तर होतीच पण अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीची कामांना वेग येणार आहे. तर वेळेत खरिपाच्या पेरण्या होतील असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

दुष्काळात तेरावा, पदरी नुकसानच

गेल्या तीन महिन्यापासून कांदा उत्पादकांना वाढीव दराची प्रतीक्षा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. असे असताना विसापूर येथे सुसाट्याच्या वाऱ्याने कांद्याच्या शेडच्या छताचे पत्रे उडून गेल्याने जवळपास 700 क्विंटल कांदा भिजल्याने नुकसान झाले. त्यामुळे साठवले तरी नुकसान अन् बाजारपेठेतही घटत्या दरामुळे नुकसान हे ठरलेलेच आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतले चित्र बदलत असताना आता 700 क्विंटल कांदा भिजल्याने हे नुकसान कसे भरुन काढले जाणार हा प्रश्नच आहे.

उशीरा का होईना मुहूर्त साधले आता पेरणीचे वेध

यंदा वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून नियमित वेळेही बरसला नाही. त्यामुळे खरिपावर चिंतेचे ढग होते. हवामान विभागाने वेळोवेळी अंदाज वर्तवले पण प्रत्यक्षात उत्तर महाराष्ट्रात मृगातच पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता खरिपपूर्व मशागतींच्या कामांना वेग येणार असून पावसामध्ये सातत्य राहिल्यास नियमित वेळी पेरण्यादेखील होतील असा अंदाज आहे. शिवाय पेरणीची पूर्ण तयारी झाली असली तर 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावर अन् जमिनीत ओलावा असल्यावरच चाढ्यावर मूठ ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

कळवण तालुक्यासह परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. हंगामातील पहिला पाऊस खरिपासाठी पोषक तर राहिलाच पण यामुळे नुकसानही अधिक झाले आहे. विसापूर येथे शेतकरी बारकू गोपू सोनवणे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वादळी वाऱ्यामुळे कांदा शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.