AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोटा झाला तरी चालेल, क्वालिटीशी तडजोड नाही; खराब आंब्याची निर्यात नाही, पुण्याच्या शेतकऱ्याचा निर्णय

कोरोना संसर्गाचा फटका बसत असताना अवकाळी पावसानं हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. alphonso farmer Nitin Kale

तोटा झाला तरी चालेल, क्वालिटीशी तडजोड नाही; खराब आंब्याची निर्यात नाही, पुण्याच्या शेतकऱ्याचा निर्णय
Nitin Kale
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 10, 2021 | 3:21 PM
Share

पुणे: हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढत आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे हापूस उत्पादक शेतकरी संकटात आला. यंदाही कोरोना संसर्गाचा फटका बसत असताना अवकाळी पावसानं हापूस आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात गारपीट झाली होती. त्यामुळे जवळपास 60 ते 70 टक्के हापूस आंबा खराब झाला आहे. यामुळे पुण्यातील शेतकऱ्यांनी आंबा निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. हापूस आंब्याची गुणवत्ता आणि भारतीय हापूस बद्दलचा परदेशातील लोकांचा विश्वास कमी होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. कोरोना महामारीचा फायदा घेत अनेकजण गैर मार्गानं पैसे कमवत आहेत, अशावेळी पुण्याच्या शेतकऱ्यांचा निर्णय आदर्शवत आहे. (Pune based alphonso farmer Nitin Kale said Trust not broken Therefore he will not export Alphonso mangoes)

चांगल्या प्रतीचा हापूस निर्यात करु

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शेतकरी नितीन काळे यांनी यंदा आंब्याला बहर कमी आला होता. त्यामुळे आंब्याचं उत्पादन कमी आहे. जो चांगल्या प्रतीचा आंबा आहे तोच निर्यात केला जाईल, असं नितीन काळे या शेतकऱ्यानं सांगितलं आहे. यावर्षी हापूसला चांगला दर मिळेल असा अंदाज होता. मात्र, 20 दिवसांपूर्वी झालेल्या गारपीटीमुळे हापूस आंब्याचं नुकसान झालं. आता फक्त चांगल्या प्रतीचा आंबा निर्यात केला जाईल, असं नितीन काळे म्हणाले.

किती फायदा व्हायचा

नितीन काळे यांची 15 एकर क्षेत्रावर आंब्याची बाग आहे. त्यामध्ये हापूस आंब्याची एकूण 750 झाडं आहेत. त्यामधून काळे यांना 20 लाख रुपयांचं उत्पन्न व्हायचं. त्यामधून त्यांना 14 लाखांचा नफा व्हायचा. यावर्षी आंबा फळ खराब झालं आहे. दर देखील पडल्यानं त्यांचं उत्पन्न कमी होणार आहे.

हापूसचे दर उतरले

साधारणपणे हापूस आंबा एका डझनला 1 हजार ते 1200 रुपयांना विकला जातो. मात्र, यावर्षी हापूस आंबा 400 ते 500 रुपयांना डझन विकला जात आहे.

हापूसला अल्फांन्सो नाव कसं मिळालं?

हापूस आंब्याला इंग्रजीमध्ये अल्फांसो म्हटलं जातं. अल्फांन्सो नाव कसा मिळालं याचा इतिहास देखील गमतीशीर आहे. अल्फांन्सो नाव पोर्तुगीज युद्ध रणनीतीकार अफोंसो अल्बूकर्क याच्या नावावरुन पडलं आहे. अफोंसो दि अल्बूकर्कला बागा लावण्याचा छंद होता. गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीजांचं राज्य होतं त्यावेळी त्यानं आंब्यांची झाडं लावली होती. इंग्रजांना हे काम आवडलं होतं. अखेर अफोंसो दि अल्बूकर्क याच्या स्मरणार्थ अल्फान्सो हे नाव ठेवण्यात आलं आजही युरोपामध्ये अल्फान्सो म्हणजेच हापूस प्रसिद्ध आहे.

संबंधित बातम्या:

हापूस आंब्याला सर्वाधिक दर का मिळतो? हापूसला इंग्रजी नाव अल्फान्सो कसं मिळालं?

हापूस आंबा ओळखण्यासाठी आता खास GI टॅग, देवगडच्या शेतकऱ्यांचा खास उपक्रम

सांगलीत मुहूर्ताच्या आंब्याचे आतषबाजीने स्वागत, रत्नागिरीच्या हापूस पेटीला मिळाले….

(Pune based alphonso farmer Nitin Kale said Trust not broken Therefore he will not export Alphonso mangoes)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली