AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?

Farmer Loan Waiver : 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफीतही एक मोठा फायदा होणार आहे. काय आहे सरकारचा निर्णय?

Farmer Loan Waiver: 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?
2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता
| Updated on: Jun 25, 2026 | 4:56 PM
Share

Farmer Loan Waiver 2026 : 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती. नवीन कर्जमाफी योजनेत या शेतकर्‍यांना लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात येत होता. पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारच्या काळात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममाफी योजेनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची एक उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या मंत्रिगटाच्या उपसमितीत याविषयीची चर्चा झाल्याचे समजते. जुन्या लाभार्थ्यांना किती प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. त्यांना अजून काय फायदा होईल याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जाहीर करणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांचे थकीत 2 लाख सरकार भरणार

राज्यात यापूर्वी 2017 मध्ये 1.5 लाख रुपये, 2019 मध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. नव्या योजनेतंर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटची तरतूद करण्यात आली आहे. थकीत कर्जातील दोन लाख रुपये सरकार भरणार आहेत. तर उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते नियमित होईल आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची सोय होईल.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांनाही फायदा?

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ही सरकारच्या विचाराधीन असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. वन टाईम सेटलमेंटचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 रोजीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. व्यापारी बँकांनाही या प्रक्रियेत आवश्यक सलवती देण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पण विरोधी पक्षाने संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सभात्याग केला.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!