AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabi Season : सरासरीचा टक्का गाठला पण मुख्य पिकाला बाजूला सारुन, मराठवाड्यातील पिकांची काय आहे स्थिती?

खरीप अंतिम टप्प्यात तर रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच धोक्यात होती. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नाही म्हणलं तरी रब्बी हंगामातील पिकांनाही बसलेला आहेच. एकतर महिनाभर उशिराने रब्बी हंगामातील पेरण्या झालेल्या आहेत असे असतानाही डिसेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र, या हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीलाच शेतकऱ्यांनी यंदा बाजूला केलेले आहे

Rabi Season : सरासरीचा टक्का गाठला पण मुख्य पिकाला बाजूला सारुन, मराठवाड्यातील पिकांची काय आहे स्थिती?
उन्हाळी हंगामातील हरभरा पीक
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 4:38 PM
Share

औरंगाबाद : खरीप अंतिम टप्प्यात तर रब्बी हंगामाच्या सुरवातीलाच धोक्यात होती. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नाही म्हणलं तरी रब्बी हंगामातील पिकांनाही बसलेला आहेच. एकतर महिनाभर उशिराने रब्बी हंगामातील पेरण्या झालेल्या आहेत असे असतानाही डिसेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरा झाला आहे. मात्र, या हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीलाच शेतकऱ्यांनी यंदा बाजूला केलेले आहे. ज्या पिकांमधून अधिकचे उत्पन्न त्यावरच भर शेतकऱ्यांनी दिला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 21 लाख हेक्टरावर रब्बी पिकांचा पेरा झाला असून यामध्ये हरभरा सर्वाधिक क्षेत्रावर आहे.

अशी आहे रब्बी हंगामातील पिकांची स्थिती

यंदा मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांच्या आशा रब्बीवर टिकून आहेत. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र 16 लाख 91 हजार हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात सरासरीच्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गहू, मका पिकाचीही अपेक्षित क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या रब्बी ज्वारीवर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव आहे. गव्हाचे पीक वाढीच्या व बऱ्याच ठिकाणी पोटरीच्या अवस्थेत आहे. गव्हाची स्थिती समाधानकारक आहे. हरभरा घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे आता उर्वरीत काळात योग्य जोपसना केल्यावरच पीक पदरात पडणार आहे.

सर्वकाही रब्बी हंगामावरच अवलंबून

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झालेला असला तरी आता गहू, हरभरा, मका, राजमा बहरात आहेत. खरीप हंगामाचे तर अतिवृष्टीमुळे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्यामुळे अजूनही मराठवाड्यातील शेतकरी हा अडचणीतच आहे. यातच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आशा केवळ रब्बी हंगामातील पिकांवरच आहेत. यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना नव्हे तर ज्यामधून अधिकचे उत्पन्न पदरी पडेल अशाच पिकांचा पेरा केला आहे. मध्यंतरीचे अवकाळीचे संकट सोडले तर सध्या सर्वच पिके ही जोमात आहेत. त्यामुळे उत्पादन वाढीची शेतकऱ्यांना आशा आहे.

लातूर कृषी विभागात हरभरा पिकावरच भर

लातूर कृषी विभागातील 5 जिल्ह्यांत रब्बी ज्वारीची 74 टक्‍के, तर औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत 77 टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाची लातूर कृषी विभागात सरासरीच्या 96 टक्‍के, तर औरंगाबाद कृषी विभागात सरासरीच्या दीडपटीपेक्षा जास्त 165 टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची औरंगाबाद कृषी विभागात सरासरीच्या 182 टक्‍के, तर लातूर कृषी विभागात सरासरीच्या 183 टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आकडेवारीनुसार शेतकऱ्यांनी ज्वारीला बाजूला सारत गहू आणि हरभरा पिकावरच भर दिला आहे.

संबंधित बातम्या :

flower farming : केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच दिले फुलशेतीमधून उत्पादन वाढीच धडे, वाचा सविस्तर

Pik Vima : रब्बी हंगाम मध्यावर तरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरिपातील पीक विम्याचीच, बीडमध्ये निदर्शने

शेतकऱ्यांची मंदीत संधी, लॉकडाउनच्या काळातही शेती व्यवसयात कोट्यावधींची गुंतवणूक..!

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.