AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ?

रब्बीच्या पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडलेल्या आहेत. असे असतानाही पेरणी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. मराठवाड्यात सर्वात आगोदर चाढ्यावर मूठ ठेवली जाते पण यंदा आतापर्यंत केवळ 9 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये बीड, जालना, औरंगाबाद जिल्हे हे मागे आहेत.

मराठवाड्यात रब्बीच्या पेरण्या संथ गतीनेच, काय आहेत कारणे ?
रब्बी हंगामातील पेरणीला सुरवात झाली आहे पण पेरणीचा वेग मंदावलेला आहे
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 12, 2021 | 11:05 AM
Share

लातूर : रब्बीच्या (Rabi season) पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडलेल्या आहेत. असे असतानाही पेरणी कामांना अद्यापही वेग आलेला नाही. मराठवाड्यात (Marathwada) सर्वात आगोदर चाढ्यावर मूठ ठेवली जाते पण यंदा आतापर्यंत केवळ 9 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यामध्ये बीड, जालना, औरंगाबाद जिल्हे हे मागे आहेत. रब्बी हंगामात दरवर्षी ज्वारीवर अधिकचा भर असतो यंदा मात्र, परस्थिती बदलली असून हरभरा आणि गव्हाकडे (Farmer) शेतकऱ्यांचा कल आहे. खरिपात झालेल्या अधिकच्या पावसाचा परिणाम हा आता रब्बी हंगामावरही जाणवू लागलेला आहे.

दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या अंतिम टप्प्यातच रब्बीच्या पेरण्या ह्या संपलेल्या असतात. यंदा मात्र, अधिकच्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या असून ज्या भागात सर्वात रब्बीची पिके बहरात येत असतात त्याच मराठवाड्यात अद्यापपर्यंत शेतकऱ्यांनी चाढ्यावरच मूठ ठेवलेली नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावरही दिसून येत आहे.

पेरण्या लांबण्याचे काय आहे कारण?

मराठवाड्यात ऑक्टोंबर अखेरपर्यंत पावसाने उघडीपच दिलेली नव्हती. त्यामुळे बीड, लातूर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतजमिनी ह्या चिभडलेल्याच होत्या. त्यानंतर जमिनीची मशागत आणि प्रत्यक्ष पेरणीला सुरवात करताना झालेला अवकाळी पाऊस यामुळे पेरणी करण्यास विलंब झाला आहे. शिवाय अधिकच्या पावसामुळे शेतजमिनी ह्या आवळून आल्या होत्या. त्यामुळे अशा अवस्थेत पेरणी केली तर उगवण होते की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य मशागत आणि वेळप्रसंगी शेत जमिन ओलवूनच पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याने उशीर झाला आहे.

अद्यापही कापूस, तूर वावरातच

खरिपातील पिकांची काढणी झाल्यावरच मशागत आणि मग रब्बीची पेरणी केली जाते. मात्र, अजूनही खरिपातील तूर आणि कापूस ही मुख्य पिके वावरातच आहेत. त्यामुळे या पिकांची काढणी झाल्यावर पेरणीचा टक्क वाढणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. सोयाबीनचे क्षेत्र केवळ पेरणीसाठी उपयोगी पडत आहे. याकरिताही पेरणीपुर्व मशागत आणि शेत जमिनी ओलवून पेरा करावा लागत असल्याने विलंब होत आहे.

अशी आहे आकडेवारी

औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 48 हजार 684 हेक्‍टर आहे. त्यापैकी 2457 हेक्‍टरवर अर्थात 1.65 टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 1 लाख 74 हजार 368 हेक्‍टर आहे. त्यापैकी 7878 हेक्‍टरवर, अर्थात 4 टक्‍के पेरणी उरकली आहे. बीड जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 81 हजार 449 हेक्‍टर आहे. त्यापैकी 45 हजार 565 हेक्‍टरवर, अर्थात 16.19 टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे.

संबंधित बातम्या :

विमा वाटपाचे काम कासवगतीने : राज्यात केवळ 8 लाख 55 हजार शेतकऱ्यांनाच मिळाली नुकसानभरपाई

अतोनात खर्च करुन कांदा पिकवला, पण कवडीचाही भाव नाही, धुळ्यात उभ्या कांद्यावर शेतकऱ्याने रोटाव्हीटर फिरवला

संशोधन समितीच शोधणार आता फळगळतीवर उपाय, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...