AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..!

राज्यातील विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचे मोठे योगदान आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषास प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये असा विक्रमी दर मिळालेला आहे. विशेष म्हणजे आता नव्याने रेशीम कोषाची आवक सुरु झाली आहे.

Silk Farming: म्हणून पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा, रेशीम कोषचे दर अवाक् करणारे..!
जालना येथील खरेदी केंद्रावरच आता रेशीम कोषची गुणवत्ता तपासली जाणार आहे.
| Updated on: Jan 28, 2022 | 4:17 PM
Share

कोल्हापूर : शेती पध्दतीमध्ये बदल केल्याशिवाय उत्पादनात वाढ नाही. वातावरणातील बदलानुसार आता पीक पध्दतीमध्ये बदल होत असला तरी शेतकरी अजूनही मोठे धाडस करीत नाही. सध्या (Silk Farming) रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी रेशीम संचलनालयही विशेष प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच राज्यात 15 हजार 795 एकरामध्ये तुतीची लागवड आहे. त्यापैकी 8 हजार 928 एकर तुती ही केवळ औरंगाबाद विभागात आहे. त्यामुळे (Maharashtra) राज्यातील विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचे मोठे योगदान आहे. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोषास प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये असा (Record rate) विक्रमी दर मिळालेला आहे. विशेष म्हणजे आता नव्याने रेशीम कोषाची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे बाजार समितीचे सभापती सुभाशसिंग रजपूत यांच्याच हस्ते रेशीम कोषाचे सौदे झाले आहेत. राज्यात ज्याप्रमाणे रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे त्याच प्रमाणे संचालनालयाच्या माध्यमातून बाजारपेठाही उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. यामुळे मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

लागवडही वाढली अन् बाजारपेठाही उभारल्या

केवळ तुतीचे लागवडीबाबत जनजागृती करण्यात आली नाही तर झालेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची भूमिका रेशीम संचानलयाने पार पाडलेली आहे. त्यामुळे बीड, जालना यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च टळला असून योग्य दरही मिळत आहे. याशिवाय रेशीम कापडाला मागणी वाढत आहे. सध्या रेशीम कोषाचे दर हे 65 ते 900 रुपये किलोंवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून महाराष्ट्राने वेगळी विक्रमही केला आहे.

रेशीम कोषच्या आवकला सुरवात

शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करावी म्हणून महारेशीम अभियान राबवण्यात आले होते. या दरम्यान, लागवडीपासून काढणी आणि बाजारपेठ पर्यंतचे मार्गदर्शन संचालनालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळेच क्षेत्रात वाढ झाली होती. आता जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बाजार समितीमध्ये रेशीम कोषाची आवक सुरु झाली आहे. मराठवाड्यात रेशीम कोषाला 55 ते 90 रुपये किलोपर्यंतचे दर मिळत आहेत. तर जयसिंगपूर येथे प्रति क्विंटल 68 हजार 500 रुपये दर मिळाला आहे. शिवाय ही सुरवात असून भविष्यात दर वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, रेशीम कोषातून एक नवा पर्याय शेतकऱ्यांसमोर उभा राहत आहे.

संबंधित बातम्या :

नैसर्गिक शेतीसाठी आंध्र प्रदेशचे पहिले पाऊल, महाराष्ट्र सरकार केव्हा घेणार निर्णय ?

APMC: मुंबई बाजार समितीचा मोठा निर्णय, अनाधिकृत व्यापार करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा

सोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.