AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugar Export : यंदा विक्रमी साखर निर्यात, ऊस गाळप अन् निर्यातीमध्येही महाराष्ट्र नंबर ‘वन’

ज्याप्रमाणे यंदा उसाच्या गाळपाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे साखर निर्यातही महत्वाची आहे. कारण देशांतर्गत साखरेचे दर हे कमी होत आहे. त्यामुळे अधिकाधिक साखर निर्यात झाली तरच येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच विशेष प्रयत्न करुन निर्यात वाढवली जात आहे. शिवाय निर्यातदारांचे हे प्रयत्नही यशस्वीही होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत 72 लाख टन साखरेचा निर्यात झाली आहे तर यंदा 90 लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याचा 'इस्मा' चा अंदाज आहे.

Sugar Export : यंदा विक्रमी साखर निर्यात, ऊस गाळप अन् निर्यातीमध्येही महाराष्ट्र नंबर 'वन'
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 22, 2022 | 5:50 AM
Share

मुंबई : ज्याप्रमाणे यंदा (Sugarcane Sludge) उसाच्या गाळपाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे साखर निर्यातही महत्वाची आहे. कारण देशांतर्गत साखरेचे दर हे कमी होत आहे. त्यामुळे अधिकाधिक (Sugar Export) साखर निर्यात झाली तरच येथील (Farmer) शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच विशेष प्रयत्न करुन निर्यात वाढवली जात आहे. शिवाय निर्यातदारांचे हे प्रयत्नही यशस्वीही होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत 72 लाख टन साखरेचा निर्यात झाली आहे तर यंदा 90 लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याचा ‘इस्मा’ चा अंदाज आहे. पण सध्याचे गाळप पाहता यापेक्षा अधिक निर्यात होणार आहे. निर्यातीमध्ये इतिहास होत असला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे वाढत्या उत्पदनाबरोबर हा प्रश्नही मार्गी लावणे गरजेचे आहे.

साखर निर्यात झाली तरच फायदा

ऊस गाळप हंगामाला 6 महिने पूर्ण झाले तरी राज्यात आणि देशात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. केवळ महाराष्ट्रात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप होणे शिल्लक आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक निर्यात यंदा होण्याचा अंदाज आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दरही टिकून आहेत. याचाच फायदा देशातील निर्यातदारांना आणि साखर उत्पादकांना होत आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे दर हे कमी आहेत. त्यामुळे निर्यातीसाठीच अधिक प्रयत्न हे केले जात असून यंदा विक्रमी साखर निर्यात होणार असल्याचा अंदाज ‘इस्मा’नेच वर्तवला आहे.

82 लाख टन साखर निर्याताचे करार

साखरेचे वाढते उत्पन्न पाहता निर्यातीवरही भर दिला जात आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी साखर निर्यातीचे धोरण ठरवले जात आहे. अजूनही महिनाभर का होईना उसाचे गाळप हे सुरुच राहणार आहे. त्यामुळे 90 लाख टन साखरेचे निर्यात करण्याचे उद्दीष्ट निर्यातदारांचे राहणार आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात 72 लाख टन साखर करारानुसार निर्यात झाली आहे तर 82 लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. सध्याची परस्थिती पाहता उद्दीष्टापेक्षा अधिक साखर निर्यात होईल असा अंदाज बांधला जात आहे.

महाराष्ट्राची भूमिका काय?

केवळ ऊस गाळपातच नाही तर साखर निर्यातीमध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र हे गाळपात आणि साखर निर्यातीमध्ये ‘नंबर वन’ वर राहिले आहे. देशातून 72 लाख टन साखरेची निर्यात झाली असली तरी यापैकी महाराष्ट्रातून 45 लाख टन साखरेचा समावेश आहे. 2013-14 पासून आतापर्यंत 291 टक्क्यांनी साखर निर्यात वाढलेली आहे. भारतामधून जगातील 121 देशांमध्ये साखर निर्यात केली जात असून त्याचा फायदा साखर कारखाने तसेच निर्यातदारांना होत आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

PM Kisan Yojna : सर्वात मोठ्या कृषी योजनेत अनियमितता, लाखो अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ, आता वसुलीचे उद्दीष्ट

Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...