AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली

पुन्हा पावसाने (Return of rain) हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी- मळणी ही रखडलेली आहेत. पावसाचा परिणाम थेट सोयाबीनच्या आवकवर झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 09, 2021 | 3:33 PM
Share

लातूर : खरीप हंगाम (Kharif Hangam) शेवटच्या टप्प्यात आला असताना देखील पावसाचे संकट हे कायम राहिलेले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनच्या काढणी कामाला वेग आला होता. पण पुन्हा पावसाने (Return of rain) हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सोयाबीनची काढणी- मळणी ही रखडलेली आहेत. पावसाचा परिणाम थेट सोयाबीनच्या आवकवर झालेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. मात्र, दोन दिवसांपासून उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, सोलापूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झालेले आहे. त्यामुळे काढणी कामे रखडलेली आहेत. शिवाय काढणी करुन लावण्यात आलेल्या गंजीचेही पावसामुळे नुकसान होत आहे. खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनवरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते मात्र, यंदा सर्वकाही पाण्यात असल्याने आगामी रब्बी हंगामाची तयारी तरी करावी कशी असा प्रश्न उपस्थित होते आहे.

उडदाने दिला आधार

दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन पीकातून भरघोस उत्पन्न पदरी पडत असते. यंदा मात्र, वावरातले पीक अजूनही बाजारपेठेत आलेले नाही. तर उडदाची काढणी ही पावसाला सुरवात होण्यापूर्वीच झालेली होती. त्यामुळे उडदाचा आधार शेतकऱ्यांना मिळालेला आहे. सध्या लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला 7300 चा दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. तर आता आवक कमी झाली असल्याने पुन्हा दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरातही घट

आवक वाढली तर दर कमी होणार हे बाजाराचे सुत्र आहे. पण सोयाबीनच्या बाबतीत असे होताना पाहवयास मिळत नाही. सोयाबीनची आवक 3 हजार क्विंटलने घटूनही शनिवारी 100 रुपयांनी दर हे कमी झाले होते. त्यामुळे काढणी-मळणी करूनही शेतकऱ्यांना सोयाबीन हे पचनी पडलेले नाही. शनिवारी सोयाबीनला 5600 चा दर मिळालेला होता.

सोमवारी बाजार बंद

शेतकरी आंदोलन दरम्यान लखीमपूरला येथे शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्याचा निषेध करीत सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार हे बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने मंगळवारी सोयाबीनची आवक वाढणार का हे पहावे लागणार आहे.

हमीभाव केंद्राचा होणार फायदा

देशातील अनेक राज्यांमध्ये यापूर्वीच मूग आणि उडदाच्या हमीभाव खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरीही खरेदी सुरू करण्याची मागणी करत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील या पिकांना योग्य दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राची मागणी केली होती त्यानुसार सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मूग आणि उडीद हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहेत. त्यात उडदाला अनेक ठिकाणी चांगला दर मिळत असला तरी हमीभावाने खरेदीची आवश्यकता होती.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6600 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6370 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6300 रुपये क्विंटल, जानकी चना 5001 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4850 , सोयाबीन 6351, चमकी मूग 7007 , मिल मूग 6500 तर उडीदाचा दर 7280 एवढा राहिला होता. (Soyabean arrivals fall again, rain affects market)

संबंधित बातम्या :

‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर

(MSP) आणि (APMC) म्हणजे नेमके काय? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती

शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?