AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane Sludge : उत्तर महाराष्ट्रात वाढला ऊसाचा ‘गोडवा’ पण शेतकऱ्यांच्या मागण्याही होणार का पूर्ण?

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप आणि आता रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नगदी पिकाला अर्थात ऊसाला याचा फटका बसलेला नाही. काही काळ ऊस पाण्यात होता पण त्याचा उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे यंदाच्या गाळपावरुन समोर येत आहे.

Sugarcane Sludge  : उत्तर महाराष्ट्रात वाढला ऊसाचा 'गोडवा' पण शेतकऱ्यांच्या मागण्याही होणार का पूर्ण?
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी नंदुरबार जिलह्यामध्ये ऊस तोडणीची कामे जोमात सुरु आहेत.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 11, 2022 | 10:58 AM
Share

नंदुरबार : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप आणि आता रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या (Cash Crop) नगदी पिकाला अर्थात ऊसाला याचा फटका बसलेला नाही. काही काळ ऊस पाण्यात होता पण त्याचा उत्पादनावर परिणाम झाला नसल्याचे यंदाच्या गाळपावरुन समोर येत आहे. पोषक वातावरणामुळे (North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यानुसार नंदुरबार जिल्हयातील तीन साखर कारखान्यांच्या माध्यमातून विक्रमी 9 लाख 64 हजार मेट्रिक टन (Sugarcane Sludge) ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून 9 लाख 34 हजार क्विंटल साखर चे उत्पादन झाले आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना अधिकच्या क्षेत्रावरील तोड बाकी आहे. त्यामुळे ऊस तोड लवकर व्हावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत. एप्रिलपर्यंत यंदाचा हंगाम कायम राहिल असा अंदाज आहे.

असे झाले ऊसाचे गाळप

यंदा सर्वाधिक उसाचे गाळप आयन मल्टी ट्रेड कारखान्याने केलं आहे. 6 लाख 50 मेट्रिक टन उसाचे गाळप केलं आहे. त्यानंतर सातपुडा आणि आदिवासी सहकारी कारखान्यांनी ऊस खरेदी केली सर्वाधिक साखरेचा उतारा आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा आहे. कारखान्याने 92 हजार 673 मेट्रिक टन उसाचे गाळप केलं असून 93 हजार 500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतलं आहे. त्यांचा साखरेचा उतारा 10.21 टक्के आहे इतर. दोघा कारखान्याचा उतारा 9 टक्के पर्यंत आहे. गाळप क्षमता पूर्ण होताच काही साखर कारखान्यांनी गाळप हे बंद केले आहे. त्यामुळे ऊसाचे काय हा प्रश्न कायम आहे.

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. त्यामुळे उत्पादनवाढीच्या अनुशंगाने क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय यंदा तर पोषक वातावरण आणि मुबलक पाणी असल्याने क्षेत्रात वाढ झाली होती. त्यामुळे गाळपही विक्रमी झाले आहे. पण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. अजूनही हंगाम पूर्ण होण्यासाठी 60 दिवासांचा कालावधी आहे. या दरम्यान, शिल्लक ऊसाची तोडणी होणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने कारखाना प्रशासनानेही नियोजन करणे गरजेचे आहे. त्याअनुशंगाने प्रयत्न केले जात असल्याचे ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी सांगितले आहे.

साखर आय़ुक्तांच्या काय आहेत सूचना?

यंदा साखरेच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली असली तरी अजूनही शेतकऱ्यांचा ऊस हा वावरातच आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक आहे. अजूनही दोन महिने ऊसाचे गाळप होणार आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळर कसे पूर्ण होईल याचे नियोजन कारखाना प्रशासनाने करणे गरजेचे आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप होईपर्यंत संबंधित कारखान्याला गाळप बंद करता येणार नाही. अधिकच्या काळामुळे उत्पादनात घट होते तर त्यामधील गोडवाही कमी होतो. त्याच अनुशंगाने नियोजन करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

अभिमानास्पद..! अकोला कृषी विद्यापीठाच्या संशोधनाची केंद्रीय समितीलाही घ्यावी लागली दखल, शेतकऱ्यांनाही दुहेरी फायदा

देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा ‘तो’ एकच निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’

Untimely Rain : धोका कायम, भंडाऱ्यात पुन्हा अवकाळीची शक्यता! पिकांची घ्यावी लागणार काळजी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली