Weather Alert | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता

हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. Heat Wave

Weather Alert | राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 1:44 PM

रत्नागिरी: हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ होवू शकते अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. (Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन

ऋतू बदल आणि उष्णता वाढ याचा आरोग्याला फटका बसण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं अवाहन हवामान खात्यानं केलंय. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या पुढे गेलाय. सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकरांना उन्हाचे चटके बसतायत. वाढलेल्या तापमानामुळे रत्नागिरीकर हैराण झालेत.

वाढलेल्या तापमानाचा आंब्याला फटका

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आंब्याची मोठी गळ होतेय. त्यामुळे बागायतदार सुद्धा चिंतेत सापडलेत. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेत. त्यामुळे सथ्या शितपेयांवर रत्नागिरीकरांनी आपला मोर्चा वळवलाय. विविध शितपेयांच्या ठिकाणी रत्नागिरीकरांची गर्दी पहायला मिळते. रत्नागिरीतील वाढत चाललेल्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

वातावरणातील अनियमिततेमध्येही 792 डझन आंबा निर्यात

वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून 792 डझन आंबा कतार आणि इंग्लंडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरुवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा मिळालाय. रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात करण्यासाठी कोरोना काळात निर्यातीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. आंबा प्रकिया झाल्यानंतर पॅकिग करून वातानुकुलीत व्हॅनमधून हा आंबा मुंबईला पाठवण्यात आला.

संबंधित बातम्या

Weather Alert : दिल्लीसह देशभरात थंडीचा कहर, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Weather Alert : राज्यात 2 दिवसांत थंडी होणार कमी, तर ‘या’ तारखेला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....