AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता

हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. Heat Wave

Weather Alert | राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 26, 2021 | 1:44 PM
Share

रत्नागिरी: हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ होवू शकते अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. (Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन

ऋतू बदल आणि उष्णता वाढ याचा आरोग्याला फटका बसण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं अवाहन हवामान खात्यानं केलंय. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या पुढे गेलाय. सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकरांना उन्हाचे चटके बसतायत. वाढलेल्या तापमानामुळे रत्नागिरीकर हैराण झालेत.

वाढलेल्या तापमानाचा आंब्याला फटका

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आंब्याची मोठी गळ होतेय. त्यामुळे बागायतदार सुद्धा चिंतेत सापडलेत. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेत. त्यामुळे सथ्या शितपेयांवर रत्नागिरीकरांनी आपला मोर्चा वळवलाय. विविध शितपेयांच्या ठिकाणी रत्नागिरीकरांची गर्दी पहायला मिळते. रत्नागिरीतील वाढत चाललेल्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

वातावरणातील अनियमिततेमध्येही 792 डझन आंबा निर्यात

वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून 792 डझन आंबा कतार आणि इंग्लंडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरुवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा मिळालाय. रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात करण्यासाठी कोरोना काळात निर्यातीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. आंबा प्रकिया झाल्यानंतर पॅकिग करून वातानुकुलीत व्हॅनमधून हा आंबा मुंबईला पाठवण्यात आला.

संबंधित बातम्या

Weather Alert : दिल्लीसह देशभरात थंडीचा कहर, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Weather Alert : राज्यात 2 दिवसांत थंडी होणार कमी, तर ‘या’ तारखेला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.