AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता

हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. Heat Wave

Weather Alert | राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका, आंबा उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता
प्रातिनिधीक फोटो
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 26, 2021 | 1:44 PM
Share

रत्नागिरी: हिवाळा संपून आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याचं दिसून येत आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्यानं हा इशारा दिलाय. दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ होवू शकते अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. (Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन

ऋतू बदल आणि उष्णता वाढ याचा आरोग्याला फटका बसण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं अवाहन हवामान खात्यानं केलंय. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या पुढे गेलाय. सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकरांना उन्हाचे चटके बसतायत. वाढलेल्या तापमानामुळे रत्नागिरीकर हैराण झालेत.

वाढलेल्या तापमानाचा आंब्याला फटका

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे आंब्याची मोठी गळ होतेय. त्यामुळे बागायतदार सुद्धा चिंतेत सापडलेत. सकाळपासून उकाड्याने हैराण झालेत. त्यामुळे सथ्या शितपेयांवर रत्नागिरीकरांनी आपला मोर्चा वळवलाय. विविध शितपेयांच्या ठिकाणी रत्नागिरीकरांची गर्दी पहायला मिळते. रत्नागिरीतील वाढत चाललेल्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

वातावरणातील अनियमिततेमध्येही 792 डझन आंबा निर्यात

वातावरणातील अनियमिततेमुळे यंदा हापूसच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच यंदा रत्नागिरीतील आंबा निर्यात केंद्रातून 792 डझन आंबा कतार आणि इंग्लंडला रवाना झाला. उत्पादन कमी असतानाही पंधरा दिवस आधीच निर्यातीला सुरुवात झाली असून स्थानिक बागायतदारांसाठी हा दिलासा मिळालाय. रत्नागिरी हापूस आंब्याची निर्यात करण्यासाठी कोरोना काळात निर्यातीच्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. आंबा प्रकिया झाल्यानंतर पॅकिग करून वातानुकुलीत व्हॅनमधून हा आंबा मुंबईला पाठवण्यात आला.

संबंधित बातम्या

Weather Alert : दिल्लीसह देशभरात थंडीचा कहर, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

Weather Alert : राज्यात 2 दिवसांत थंडी होणार कमी, तर ‘या’ तारखेला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

(Temperature will be increase in Ratnagiri and Sindhudurg due to Heat Wave)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली