AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wheat : गहू निर्यातबंदीचा असा ‘हा’ फायदा, व्यापारी संघटनांनी मांडले वास्तव

गव्हाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. शिवाय रशिया-युक्रेन या निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादनावरही युध्दजन्य परस्थितीचा परिणाम झाला आहे. शिवाय इतरत्र भागामध्ये अचानक व मोठ्या प्रमाणात पसरलेल्या उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतामध्ये किरकोळ उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गव्हाची टंचाई भविष्यात निर्माण होऊ शकते शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही घट झाली आहे.

Wheat : गहू निर्यातबंदीचा असा 'हा' फायदा, व्यापारी संघटनांनी मांडले वास्तव
केंद्र सरकारने गहू निर्यातबंदीचा निर्णय घेतला असून व्यापाऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे.Image Credit source: TV9 (फाइल फोटो)
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 15, 2022 | 11:07 AM
Share

मुंबई : भारतामधील गव्हाला अधिकची मागणी आणि चांगला दर असतानाही (Wheat Export) निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे मोठे नुकसान होणार अशी शक्यता वर्तवली जात असतानाच केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत (CAT) कॅट या प्रमुख व्यापारी संघटनेने केले आहे. हा निर्णय कडवट असला तरी यामुळे (Wheat Stock) साठेबाजीला आळा बसणार आहे. यासंदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने एक पत्र जारी केले असून यामध्ये निर्यातीपेक्षा देशांतर्गत वापराची पूर्तता करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने निभावली आहे. यामुळे सरकारची वचनबद्धता दर्शवते.देशात अनियोजित, अचानक व मोठ्या प्रमाणात पसरलेल्या उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. जागतिक पातळीवर गव्हाचा तुटवडा असून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे त्याचे प्रमुख कारण आहे. भारतामध्ये किरकोळ उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा असून त्यापैकीच अन्न असलेल्या गव्हाची कमतरता भासणार नाही यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गव्हाच्या उत्पादनात घट

गव्हाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. शिवाय रशिया-युक्रेन या निर्यात करणाऱ्या देशातील उत्पादनावरही युध्दजन्य परस्थितीचा परिणाम झाला आहे. शिवाय इतरत्र भागामध्ये अचानक व मोठ्या प्रमाणात पसरलेल्या उष्णतेमुळे गव्हाच्या उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतामध्ये किरकोळ उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गव्हाची टंचाई भविष्यात निर्माण होऊ शकते शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही घट झाली आहे. देशात गव्हाची टंचाई भासू नये म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

निर्णयाचे परिणाम 48 तासानंतर

जगात गव्हाच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनच्या पाठोपाठ भारतामध्ये गव्हाचे उत्पादन होत आहे. यंदा मात्र, उत्पादन घटेल असा अंदाज आहे. शिवाय देशांमध्येही हीच परस्थिती आहे. भारतात गव्हाचा तुटवडा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक असून त्यामुळे सरकारच्या निर्णयाचे कौतुक करायला हवे, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि महानगर मुंबई प्रांताचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी म्हटले आहे. साहजिकच या बंदीचा शेतकरी व व्यापाऱ्यांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, पण या बंदीचा बाजारावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी किमान 48 तासांची गरज आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा