AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

द्राक्षातील दर निश्चितीचा उपक्रम आता पपईसाठीही, नियम मोडणार की टिकणार..!

शेतीमालावर झालेला खर्च, वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून दर निश्चित केले जात आहेत. यापूर्वी नाशिक, सोलापूर आणि सांगली येथे द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार काही भागांमध्ये विक्रीही सुरु आहे. आता अशाच प्रकारचा निर्णय खानदेशात पपई उत्पादक, बाजार समिती आणि खरेदीदारांनी घेतला आहे.

द्राक्षातील दर निश्चितीचा उपक्रम आता पपईसाठीही, नियम मोडणार की टिकणार..!
नंदूरबारमध्ये पपईचे दर ठरल्यामुळे आता पुन्हा 15 दिवसानंतर तोड सुरु झाली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 22, 2022 | 11:39 AM
Share

जळगाव : शेतीमालावर झालेला खर्च, (Climate Change) वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून दर निश्चित केले जात आहेत. यापूर्वी नाशिक, सोलापूर आणि सांगली येथे द्राक्षाचे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार काही भागांमध्ये विक्रीही सुरु आहे. आता अशाच प्रकारचा निर्णय खानदेशात (Papaya Production) पपई उत्पादक, बाजार समिती आणि खरेदीदारांनी घेतला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे निर्णय घेण्याचे ठरले होते पण एकमत न झाल्याने हा निर्णय रखडला होता. आता पपई काढणी सुरु झाल्याने हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याने प्रति किलो (Papaya Rate) 8 रुपये दरनिश्चित करण्यात आला आहे. एकमुखाने हा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात खरेदी-विक्री होताना त्याची अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. अन्यथा यामध्ये फूट पडली तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत शहादा बाजार समितीमध्ये निर्णय झाला आहे. सध्या हंगाम जोमात सुरु असून या निर्णयाचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना फायदा होणार आहे.

उत्पन्नापेक्षा नुकसानच अधिक

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका फळबागायत शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. त्यामुळे खानदेशातील अनेक शेतकऱ्यांनी पपई बागाची मोडणी करुन इतर पिकांचा पर्याय निवडला. तर काहींनी तळहाताच्या फोडाप्रमाणे बागा जोपासल्या. आता प्रत्यक्ष विक्रीची वेळ आली असताना व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने मागणी होत आहे. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नसल्याने हा दर निश्चित केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

काय आहे बाजारपेठेतले चित्र?

पपई उत्पादनात मोठी घट झाल्याने आहे त्या शेतीमालाला चांगला दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यानुसारत शाहदा बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत हा दर ठरवून घेण्यात आला आहे. असे असले तरी खानदेशात सध्या सरासरी 16 टन पपईची आवक होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून अधिकची आवक असून त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, मुक्ताईनगर येथून आवक सुरु आहे. वाढत्या उष्णतेमध्ये स्थानिक बाजार पेठेत मागणी नसली तरी राजस्थानमधून मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जे नुकसान निसर्गामुळे झाले आहे त्याची तर भरपाई व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करी आहेत.

निर्णय झाला टिकवणे महत्वाचे…

जानेवारीमध्ये द्राक्ष काढणीला वेग येताच नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक संघानेही महिन्यानुसार द्राक्षाचे दर निश्चित केले होते. पण काळाच्या ओघात व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. निर्यातीसाठी ठरलेला दर परवडत नसल्याचे सांगून नियमाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आता खानदेशात पपईचे ठरलेले दर आणि त्यासंबंधीची नियमावलीची अंमलबजावणी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!

देर आए… दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर

FRP : ज्याची धास्ती शेतकऱ्यांना ‘तोच’ निर्णय राज्य सरकारचा, ‘एफआरपी’ बाबत नेमके काय झाले?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?