AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजबच : शेतीमाल साठवणूकीसाठी बारदानाच नसल्याने भात खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे नुकसान

भात शेतीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे पण अद्यापपर्यंत खरेदी केंद्रच सुरु झालेली नाहीत. कारण काय तर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विकास महामंडळाकडे बारदाणाच शिल्लक नाही. त्यामुळे कोकणातील पालघर ,ठाणे ,रायगड जिल्ह्यात भाताचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही.

अजबच : शेतीमाल साठवणूकीसाठी बारदानाच नसल्याने भात खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे नुकसान
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 6:43 PM
Share

पालघर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण दुसरीकडे शेतामध्ये उत्पादीत झालेल्या शेतीमालाचे नुकसानही याच सरकारमुळे होत आहे. कारण भात शेतीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे पण अद्यापपर्यंत खरेदी केंद्रच सुरु झालेली नाहीत. कारण काय तर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विकास महामंडळाकडे बारदानाच शिल्लक नाही. त्यामुळे कोकणातील पालघर ,ठाणे ,रायगड जिल्ह्यात भाताचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही.

चालू वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ कडून  भात खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळे याचा फायदा व्यापारी घेत असून कमी भावाने खाजगी व्यापारी  भात खरेदी करीत असल्यामुळे  आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर भात खरेदी केंद्र सुरु करावी अशी मागणी कोकणातील शेतकरी करीत आहेत

गतवर्षी झाले होते योग्य नियोजन

गतवर्षी संपूर्ण कोकणातून 6 लाख 65 हजार क्विंटलची साळीची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी पालघर जिल्हात 30 भात खरेदी केंद्रातून 3 लाख क्विंटल साळीची खरेदी करण्यात आली होती. तर शेतकऱ्याला 1860 रुपये प्रमाणे दर मिळाला होता. या वर्षी 1940 रुपये भाव देण्यात येणार आहे. मागच्या भावा नुसार 80 रुपये वाढ करण्यात आली आहे. दरवाढ करण्यात आली आहे मात्र, खरेदी केंद्रच सुरु नसल्याने या दरवाढीचा काय उपयोग असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

गतवर्षीच्या बारदान्याचे पैसही महामंडळाकडेच

गतवर्षीही बारदान्याअभावीच खरेदी रखडलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत: जवळील बारदाना देऊ केला होता. मात्र, या बदल्यात शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाणार होती. पण अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा शेतकरी बारदाना देण्याचे टाळत आहेत. उत्पादन झाले आहे मात्र, त्याची विक्री करावी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दुसरीकडे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर कोकणात मात्र, उत्पादन झाले आहे पण खरेदी केंद्रच सुरु नसल्याने खासगी व्यापारी हे मनमानी किंमतीमध्ये खरेदी करीत आहेत. त्यामुळे महामंडाळाने त्वरीत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

दोन दिवसांमध्ये खरेदी केंद्र सुरु करणार

राज्यात कोकणात अवकाळी पाऊस झाला अजूनही भात शेतकऱ्यांच्या खळ्यावर बांधावर आहे. येत्या दोन दिवसात पालघर जिल्ह्यात भात खरेदीचा शुभारंभ आम्ही करणार असल्याची माहीती कृषी मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे. पालक मंत्री दादा भुसे यांनी सर्व भात खरेदी केंद्रांना मान्यता दिलेली आहे. पण अद्याप सुरु झाले नाहीत ही शोकांतिका आहे.

संबंधित बातम्या :

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सायकल वारी, प्रशासनाच्या दरबारी, तरुण शेतकऱ्याची राज्यभर भ्रमंती

मराठवाड्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप, कशामुळे होत आहे दिरंगाई?

कमी खर्चात अधिकचे उत्पादन, ढोबळी मिरची लागवडीची योग्य पध्दत कोणती?

https://www.youtube.com/c/TV9MarathiLive/videos

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.