AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय

उदगीर रेल्वेस्थानकातून इतर बाजारपेठेत शेतीमालाची निर्यात करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने याला मंजूरी दिली असून आता उदगीर रेल्वेस्थानकातून रेशीमकोष, आद्रक, भाज्या, फळे, फुले, मासे यांची विक्री आता योग्य बाजारपेठेत करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहे.

उदगीरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता योग्य बाजारपेठ, रेल्वे प्रशासनाने घेतला शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 23, 2021 | 11:21 AM
Share

लातूर : शेतीमालाचे उत्पादन वाढत आहे पण योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत मालाची विक्री करावी लागत होती. मात्र, उदगीर रेल्वेस्थानकातून इतर बाजारपेठेत शेतीमालाची निर्यात करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अखेर दक्षिण-मध्य रेल्वे विभागाने याला मंजूरी दिली असून आता उदगीर रेल्वेस्थानकातून रेशीमकोष, आद्रक, भाज्या, फळे, फुले, मासे यांची विक्री आता योग्य बाजारपेठेत करण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहे.

शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे सरकारचेही धोरण आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे उदगीरसह लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाची मोठ्या बाजारपेठेत निर्यांत करणे सहज शक्य होणार आहे. शेतकऱ्यांची इच्छा असतानाही बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. पण आता दक्षिण-मध्य रेल्वेने शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय घेतला आहे.

तीन स्थानकातून होणार शेतीमालाची निर्यात

उदगीर तालुक्यातील भालकी, उदगीर व बिदर या रेल्वे स्थानकातून शेतीमालाच्या वाहतूकीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या बाजारपेठेत निर्यात आता करण्याची व्यवस्था ही झाली आहे. रेशीम कोषासह इतर शेतीमाल व मासे निर्यातीची परवानगी देण्यात आली आहे. उदगीर तालुक्यात टोमॅटो, शेवगा, चिंच, आंबे, बोरं याचे मोठे प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे शेतीमाल कोणताही असो योग्य बाजारपेठ मिळाली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

या ठिकाणी होणार शेतीमालाची वाहतूक

उदगीर बसस्थानकातून दिवसाला 10 रेल्वेगाड्या धावतात. यामध्ये नांदेड, बंगळूर, मुंबई, शिर्डी, सिंकदराबाद, विजयवाडा, हैदराबाद, हडपसर, औरंगाबाद, पूर्णा या ठिकाणी शेतीमालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे. शिवाय याकरिता शेतकऱ्यांना खर्चही कमी येणार आहे. आतापर्यंत उदगीर आणि बिदर येथील रेल्वेस्थानकातून केवळ रेशीम कोष ची वाहतूक केली जात होती. पण आता सर्वच शेतीमालाच्या वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वेला 4 कोटी 25 लाख रुपये मिळाले देखील

सध्या सोयाबीन आणि साखरेची निर्यात करण्याचा हंगाम सुरु आहे. सोयाबीनची शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली आहे तर ऊसाचे गाळप सुरु आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन आणि साखरेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच अनुशंगाने रेल्वेला 4 कोटी 25 लाख रुपये भाडे देखील मिळालेले आहे. आता इतर शेतीमालाच्या उत्पादनानुसार शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने रेल्वेचे देखील उत्पन्न वाढणार आहे. शेतीमालाची निर्यात करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानकात नोंद करण्याची अवाहन रेल्वेचे अधीक्षक दीपक जोशी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

थकीत ‘एफआरपी’चा गुंता आता उच्च न्यायालयात, लोकवर्गणीतून उभारला जाणार लढा

बीजोत्पादनाचे दोन फायदे म्हणूनच महाबिजची गावोगावी जनजागृती, उस्मानाबादमध्येही होणार प्रयोग

शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी सरपंचानीच रोखला राष्ट्रीय महामार्ग, भाजपचाही पाठिंबा

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल