AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon : केळीची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी, कापणी सुरु असतानाच नेमकं घडले काय ?

केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले पीक असले तरी सध्याच्या वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली होती. त्यामुळे दरातही वाढ झाली होती. याचा फायदा होईल असे शेतकरी महेश पाटील यांना वाटत होते. मात्र, अवघ्या काही क्षणात त्यांचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या काही केळीच्या खोडाची कापणी झाली होती पण अधिकचे नुकसानच या घटनेत झाले आहे.

Jalgaon : केळीची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी, कापणी सुरु असतानाच नेमकं घडले काय ?
शॉर्टसर्किटमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या केळी बागेचे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 12:40 PM
Share

जळगाव : जिल्ह्यात केळी बागाचे मोठे क्षेत्र आहे. मध्यंतरीच्या वातावरणातील बदलावर शेतकऱ्यांनी मात केली मात्र असे असूनही यावल साकळी येथील शेतकरी आपली (Banana Crop) केळीची बाग वाचवू शकला नाही. शॉर्टसर्किटमुळे आतापर्यंत (Sugarcane) ऊसाचे फड पेटले होते. अशा अनेक घटना राज्यातील विविध भागांमध्ये घडल्या आहेत. मात्र, कापणी सुरु असतानाच (Short Circuit) शॉर्टसर्किटमुळे केळीची बाग उध्वस्त झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी शिवारात घडली आहे. त्यामुळे शेतकरी महेश पाटील यांचे न भरुन निघणारेच नुकसान झाले आहे. विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे हा प्रकार घडला आहे. यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे.

दृष्टीक्षेपातील उत्पादन आगीने उध्वस्त

केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले पीक असले तरी सध्याच्या वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली होती. त्यामुळे दरातही वाढ झाली होती. याचा फायदा होईल असे शेतकरी महेश पाटील यांना वाटत होते. मात्र, अवघ्या काही क्षणात त्यांचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या काही केळीच्या खोडाची कापणी झाली होती पण अधिकचे नुकसानच या घटनेत झाले आहे.

15 लाखाचे नुकसान

साकळी शिवारात महेश पांडूरंग पाटील यांनी 7 हजार 500 केळीच्या खोडाची लागवड केली होती. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जोपासल्यानंतर आता कुठे कारणीला सुरवात झाली होती. तर दुसरीकडे पिल बाग उभा होता. या पिल बागाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांनी शेतात पाइपलाइन टाकली होती. हे सर्व सुरु असतानाच अचानक केळीच्या बागेला आग लागली आहे. यामध्ये केळी पिकाचे तर नुकसान झालेच पण पाईपलाईन आणि ठिबकच्या नळ्याही जळून खाक झाल्या आहेत.

नुकसानभरपाईची मागणी

यंदा प्रत्येक पिकावर अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये पाटील यांनी केळी बोग जोपासली. पण महावितरणच्या हलगर्जीपणामुळे पाटील यांचे नुकसान टळले नाही. विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या दुर्घटनेत त्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे पाटील यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.