महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार, 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची करणार विक्री

कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार, 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची करणार विक्री
महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 10:00 PM

नवी दिल्ली : येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असून सर्व वाहन निर्माता कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देत आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करणार आहे. तसेच या क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घेण्याबाबत कंपनी विचार करत असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. महिंद्रा अँड महिंद्रा जागतिक स्तरावर आपल्या क्षमतेचा वापर करुन ईव्ही प्लॅटफॉर्मच्या विकासावर जोमाने काम करीत आहेत. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिष शहा म्हणाले, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही पूर्वी जे बोललो होतो त्याव्यतिरिक्त ही गुंतवणूक असेल. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

येत्या पाच वर्षात वाहन आणि कृषी क्षेत्रात 9000 कोटी गुंतवणार

येत्या पाच वर्षांत वाहन आणि कृषी क्षेत्रात 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा यांनी आधी सांगितले होते. कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय नवीन संशोधन आणि विकास केंद्रात (आर अँड डी) 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने यापूर्वीच बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा प्रकल्प सुरू केला आहे. हे बॅटरी पॅक, उर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर्स तयार करते. याशिवाय महाराष्ट्रात पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठीही कंपनीने गुंतवणूक केली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा आणि इस्रायली कंपनी आरईई यांच्यात करार

अलीकडेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदारी संभाळणारे शाह म्हणाले की गुंतवणूकीची रक्कम नव्या प्लॅटफॉर्म व इतर संबंधित कामांच्या विकासासाठी वापरली जाईल. प्लॅटफॉर्मद्वारे समूहाच्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करून विविध मॉडेल्स तयार केले जातील. याशिवाय ते म्हणाले की कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या भागीदारीवरही विचार करेल. येणारा काळ हा ईलेक्ट्रीक वाहनांचा आहे. शाह म्हणाले, आम्ही इस्रायली कंपनी आरईई (ऑटोमोटिव्ह) सह सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. हे लहान ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी आहे. आणि आमच्याही ईव्ही क्षेत्रात इतर भागीदारी असतील. म्हणजे आम्ही युतीसाठी तयार आहोत. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

इतर बातम्या

दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात, लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड

शानदार लुक, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, Tata च्या ‘या’ कारला भारतीय ग्राहकांची पसंती

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.