AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार, 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची करणार विक्री

कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार, 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची करणार विक्री
महिंद्रा अँड महिंद्रा इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटींची गुंतवणूक करणार
| Updated on: Apr 11, 2021 | 10:00 PM
Share

नवी दिल्ली : येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असून सर्व वाहन निर्माता कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देत आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करणार आहे. तसेच या क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घेण्याबाबत कंपनी विचार करत असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. महिंद्रा अँड महिंद्रा जागतिक स्तरावर आपल्या क्षमतेचा वापर करुन ईव्ही प्लॅटफॉर्मच्या विकासावर जोमाने काम करीत आहेत. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिष शहा म्हणाले, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही पूर्वी जे बोललो होतो त्याव्यतिरिक्त ही गुंतवणूक असेल. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

येत्या पाच वर्षात वाहन आणि कृषी क्षेत्रात 9000 कोटी गुंतवणार

येत्या पाच वर्षांत वाहन आणि कृषी क्षेत्रात 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा यांनी आधी सांगितले होते. कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय नवीन संशोधन आणि विकास केंद्रात (आर अँड डी) 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्राने यापूर्वीच बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा प्रकल्प सुरू केला आहे. हे बॅटरी पॅक, उर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर्स तयार करते. याशिवाय महाराष्ट्रात पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठीही कंपनीने गुंतवणूक केली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा आणि इस्रायली कंपनी आरईई यांच्यात करार

अलीकडेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदारी संभाळणारे शाह म्हणाले की गुंतवणूकीची रक्कम नव्या प्लॅटफॉर्म व इतर संबंधित कामांच्या विकासासाठी वापरली जाईल. प्लॅटफॉर्मद्वारे समूहाच्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर करून विविध मॉडेल्स तयार केले जातील. याशिवाय ते म्हणाले की कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या भागीदारीवरही विचार करेल. येणारा काळ हा ईलेक्ट्रीक वाहनांचा आहे. शाह म्हणाले, आम्ही इस्रायली कंपनी आरईई (ऑटोमोटिव्ह) सह सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. हे लहान ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी आहे. आणि आमच्याही ईव्ही क्षेत्रात इतर भागीदारी असतील. म्हणजे आम्ही युतीसाठी तयार आहोत. (Mahindra & Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, sell 5 lakh electric vehicles by 2025)

इतर बातम्या

दमदार पावरसह सुझुकी हयाबुसा पुन्हा एकदा बाजारात, लॉन्च होण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड

शानदार लुक, 5 स्टार सेफ्टी रेटिंग, Tata च्या ‘या’ कारला भारतीय ग्राहकांची पसंती

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.