AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti च्या गाड्यांमध्ये दोष, तब्बल 1.81 लाख वाहने परत मागवली

एका निवेदनात मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) म्हटले आहे की, त्यांनी सियाज, एस क्रॉस, विटारा ब्रेझा, अर्टिगा आणि एक्सएल 6 चे पेट्रोल मॉडेल परत मागवले आहेत.

Maruti च्या गाड्यांमध्ये दोष, तब्बल 1.81 लाख वाहने परत मागवली
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 4:45 PM
Share

मुंबई : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) शुक्रवारी जाहीर केले की, कंपनीने आपल्या कार्सचे 1.81 लाख युनिट्स परत मागवले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, या वाहनांमध्ये काही समस्या आली आहे, जी सुरक्षेशी संबंधित आहे. यामुळे अनेक वाहने परत मागवण्यात आली आहेत. ज्या ग्राहकांचे वाहन परत मागवण्यात आले आहे अशा कार मालकांना त्यांचे वाहन मारुती सुझुकीच्या वर्कशॉपमध्ये घेऊन जावे लागेल. (Maruti Suzuki to recall 1.8 lakh cars to inspect motor generators)

एका निवेदनात मारुती सुझुकीने म्हटले आहे की, त्यांनी सियाज, एस क्रॉस, विटारा ब्रेझा, अर्टिगा आणि एक्सएल 6 चे पेट्रोल मॉडेल परत मागवले आहेत. या वाहनांच्या निर्मितीची तारीख 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 दरम्यान असावी. जेव्हा या वाहनांना परत बोलावण्यात येईल, तेव्हा त्यांच्या मोटर जनरेटेड युनिट्सची तपासणी केली जाईल. वाहनामध्ये काही अडचण असल्यास, कंपनी ग्राहकांकडून कोणतेही पैसे न घेता त्याची दुरुस्ती करुन देईल.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून वाहनातील खराब झालेले भाग बदलले जातील. मारुती सुझुकीने येथील कार मालकांना विचारले आहे की, त्यांनी सध्या कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी वाहन घेऊन जाऊ नये किंवा वाहनाच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक भागांवर पाणी फवारु नये.

ज्या ग्राहकांना त्यांचे वाहन या रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही हे तपासायचे आहे, ते मारुती सुझुकी आणि नेक्साच्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करू शकतात. येथे त्यांना वाहनाचा मॉडेल क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर त्यांचे वाहन या रिकॉल प्रक्रियेचा भाग आहे की नाही याची माहिती त्यांच्यासमोर येईल.

चेसिस क्रमांक वाहनाच्या आयडी प्लेटवर आहे आणि वाहन चालान/नोंदणी कागदपत्रांमध्ये देखील नमूद आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी सप्टेंबरमध्ये उत्पादन घटण्याची अपेक्षा करत आहे, कारण सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. कंपनीने मंगळवारी एक्सचेंज दाखल करताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये एकूण उत्पादन सामान्य उत्पादनाच्या सुमारे 40% असू शकते.

इतर बातम्या

Tata Motors चा बाजारात धुमाकूळ, ऑगस्टमधील वाहनांच्या विक्रीत 53 टक्क्यांची वाढ

ऑगस्ट महिन्यात वाहन कंपन्यांची जोरदार कमाई, मारुती सुझुकी, ह्युंडई, स्कोडाच्या विक्रीत वाढ

Auto Sales August : ऑटो सेक्टर रुळावर, बजाज, MG मोटर्स, टोयोटाची विक्री वाढली

(Maruti Suzuki to recall 1.8 lakh cars to inspect motor generators)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.