AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची अल्प उत्पन्न गटाला खुशखबर, खात्यात अधिक पगार जमा होणार

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा लाभ 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार

मोदी सरकारची अल्प उत्पन्न गटाला खुशखबर, खात्यात अधिक पगार जमा होणार
वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 10, 2020 | 10:53 AM
Share

नवी दिल्ली : कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’च्या (Atmanirbhar Bharat Rojgar Yojna) अंतर्गत सरकार दोन वर्षांपर्यंत रिटायरमेंट फंडात (EPF) कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्या वतीने रक्कम जमा करेल. एक ऑक्टोबर 2020 पासून 30 जून 2021 पर्यंत कंपनी आणि इतर आस्थापनांमध्ये भरती होणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. (More salary for employees earning less than 15 thousand)

कर्मचाऱ्यांच्या वतीचे 12 टक्के आणि नियोक्त्याच्या वतीची 12 टक्के रक्कम केंद्र सरकार भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करेल. ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’चा लाभ 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. 1 ऑक्टोबर 2020 च्या आधी कर्मचारी भविष्य निधी संघटनेशी (EPFO) संबंधित आस्थापनात नोकरी न करणारे, युनिवर्सल अकाऊंट नंबर (UAN) किंवा ईपीएफ सदस्यत्व नसलेले कर्मचारीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थी कोण?

‘ईपीएफओ’शी (EPFO) निगडीत ज्या कर्मचाऱ्यांचे यूएएन (UAN) खाते आहे आणि ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, मात्र 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कोव्हिड काळात त्यांची नोकरी गेली असेल, मात्र त्यानंतरही ईपीएफओशी संबंधित कुठल्याच संस्थेत ते नोकरी करत नसतील, तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

याव्यतिरिक्त, एक हजारापर्यंत नवीन रोजगार देणार्‍या कंपन्यांमध्ये सरकार कर्मचारी आणि नियोक्ता अशा दोन्ही भागांचे योगदान देईल. तर एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन रोजगार देणाऱ्या कंपन्यांना दोन वर्षांसाठी प्रत्येक कर्मचार्‍याच्या 12 टक्के वाटा सरकार देईल.

23,000 कोटींची आत्मनिर्भर भारत रोजगार योजना मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’वर (Atmanirbhar Bharat Rojgar Yojna) 22 हजार 810 कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या संकट काळात कंपन्यांना नव्या नोकरभरतीसाठी प्रोत्साहित करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मंत्रिमंडळाने चालू आर्थिक वर्षात 1,584 कोटी रुपये, तर योजनेच्या संपूर्ण काळासाठी 22,810 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सरकारची ही योजना 2020 ते 2023 या काळात सुरु राहील.

संबंधित बातम्या :

नोकरी गमावलेल्यांसाठी मोठी घोषणा, 15 हजारांखालील बेरोजगारांना PF चा लाभ

(Atmanirbhar Bharat Rojgar Yojna – More salary for employees earning less than 15 thousand)

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या