AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅशलेस नाही तर कॅश कॅश चा नारा, नव्या नियमांचा डिजिटल व्यवहारांना फटका 

कॅशलेस, नगद रक्कम विरहीत अर्थव्यवस्थेसाठी सरकार प्रयत्नरत असले तरी लोकांची मानसकिता आणि डिजिटल व्यवहारांवर नव्या नियमांनुसार द्यावा लागणारा आकार यामुळे ग्राहक पुन्हा नगद व्यवहारावर जोर देऊ शकता.

कॅशलेस नाही तर कॅश कॅश चा नारा, नव्या नियमांचा डिजिटल व्यवहारांना फटका 
money
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 29, 2021 | 9:27 AM
Share

मुंबई :  देशातील काळाबाजार आणि खोट्या चलन व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने अचानक नोटाबंदीचा निर्णय घेतला होता.  गेल्या महिन्यांत पाच वर्षांपूर्वीच्या या घटनेचे विश्लेषण आणि आढावा घेण्यात आला. त्यात अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. नागरिकांनी नगद अथवा रोख व्यवहारांना कात्री लावली नाही. तर त्यात वाढ दिसून आली.

आता डिटीटल व्यवहार, एटीएम व्यवहार आणि बँकेत रक्कम जमा करणे आणि काढण्यासंदर्भात नवीन नियम दोन दिवसानंतर येऊन धडकणार आहेत. अगदोरच महागाईने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना या नव्या नियमांचा फटका बसण्याची शक्यता असल्याने ग्राहक जास्तीत जास्त व्यवहार रोखीने करण्याची शक्यता समोर आली आहे. अर्थात याविषयीचा निष्कर्ष सहा महिन्यांतर आती येऊ शकेल. मात्र सध्या डिजिटल पेमेंट विषयी नव्या निर्बंधांमुळे ग्राहकांत नाखूशी आहे. तिचा परिणाम व्यवहारांवर नक्कीच पहायला मिळेल.

नोटाबंदीचा परिणाम नाही

देशातील लोकांनी रोखीने व्यवहार करण्याला पसंती आणि प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. 4 नोव्हेंबर 2016 रोजी नगद व्यवहार 17.97 लाख कोटीच्या घरात होता. तर 8 नोव्हेंबर 2021 रोजी  28.30 लाख कोटींचा व्यवहार हा रोख स्वरुपात करण्यात आला. अर्थात पाच वर्षांत नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये विश्वसनीय प्रगती झालेली दिसत नाही. उलट रोखीतील व्यवहारात लोकांचा विश्वास कायम असल्याचे दिसून आले. 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने रात्री 8 वाजता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नवीन नोटा बाजारात आल्या होत्या.

नगद व्यवहाराची मुख्य कारणे

  1. मोठ्या प्रमाणात व्यापारी अद्यापही रोखीने व्यवहार करण्यावर भर देतात.
  2. जवळपास 15 कोटी लोकांकडे अजूनही बँक खाते नाही
  3. ग्रामीण भागात अजूनही नगदी व्यवहाराचे प्रचलन
  4. ऑनलाईन फसवेगिरीच्या घटनांमुळे डिजिटल व्यवहारांबाबत साशकंता
  5. मेट्रो शहरातही 90 टक्के ई-कॉमर्स व्यवहार रोखीने

नवीन व्यवहार महागणार

1 जानेवारीपासून बँक ग्राहकांना सेवांपोटी  अतिरिक्त शुल्काचा फटका बसणार आहे. अनेक बँकांनी आर्थिक आणि गैरआर्थिक सेवा नियमांत बदल केले आहेत. हे बदल येत्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून लागू होतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसह आघाडीच्या सरकारी आणि खासगी बँकांनी  एटीएम व्यवहार/ बँक व्यवहार नियमांमध्ये बदल केला आहे. 1 जानेवारीपासून हे नवीन नियम लागू होतील. नवीन वर्षाच्या स्वागत करतानाच तुमच्या खिश्याला या नियमांमुळे कात्री लागेल. महिन्याच्या सुरुवातीचे चार अथवा त्यानंतरचा एखादा व्यवहार निःशुल्क ठेऊन उर्वरीत  एटीएममधून व्यवहार केल्यास शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.जितकी रक्कम काढणार आहात तिच्या प्रति व्यवहार करासहित 21 ते 25 रुपयांपर्यंत ग्राहकाला भूर्दंड पडणार आहे. हाच नियम बँक खात्यात रक्कम जमा करणे अथवा काढण्याला ही लागू करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक