कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत.

कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा
कच्च्या तेलाची आयात वाढली
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 7:02 AM

रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले आहेत. दरम्यान कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झालेली असताना देखील भारतात पेट्रोल (Petrol),डिझेलचे दर वाढवण्यात आले नव्हेत. त्यामुळे या कंपन्याना मोठा फटका बसला. मात्र आता कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने या कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी कच्च्या तेलाच्या दराने 100 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. सात मार्चला तर कच्च्या तेलाचे भाव गेल्या 14 वर्षातील रेकॉर्ड तोडत 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र आता पुन्हा एकदा दर कमी होताना दिसत आहेत. चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत.

एका आठवड्यात 40 डॉलरनी कमी झाले भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने कमी होताना दिसत आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या भावात प्रति बॅरल मागे 40 डॉलरची घट झाली आहे. सात मार्चला क्रूड ऑईलचे दर 139 डॉलर प्रति बॅरल होते. तर चालू आठवड्यात ते 99 डॉलर प्रति बॅरलच्याही खाली आले आहेत. याचाच अर्थ कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सरासरी चाळीस डॉलरची घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होने ही भारतासाठी दिलासादायक गोष्ट आहे. कारण भारत हा कच्च्या तेलाचा जगातील एक मोठा आयातदार देश आहे.

पेट्रोलियन कंपन्यांना दिलासा

गेल्या 15 दिवसांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर वाढत होते. कच्च्या तेलाचे वाढते दर पहाता दहा मार्चला पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जातील असा अंदाज होता. मात्र निवडणूक निकालानंतर देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले. इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने पेट्रोलियम कंपन्यावरील दबाव वाढला होता. मात्र आता कच्च्या तेलाचे दर काहीप्रमाणात कमी झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या चार नोव्हेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या

मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

Vehicle Scrappage Policy: वेहिकल स्क्रपिंग प्रोसेस पूर्णतः होईल डिजिटल, सरकार ने जाहीर केली नवीन नियमावली

ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे ‘उज्जीवन’ , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.