AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज

आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी (Fuel Import) 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे.

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 23, 2022 | 2:40 PM
Share

आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडलेल्या श्रीलंकेला (Sri Lanka) पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी (Fuel Import) 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत श्रीलंकेच्या आर्थमंत्र्यांनी माहिती दिली. ते याबाबत बोलताना म्हणाले की, भारताने श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. हा श्रीलंकेसाठी सध्या परिस्थितीमध्ये मोठा आधार आहे. सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या संकटातून कसा मार्ग काढता येईल? याबाबत आयएफएमसोबत चर्चा सुरू आहे. श्रीलंका लवकरच या संकटातून बाहेर पडेल. अशी खात्री आहे. भारताने संकट काळात श्रीलंकेला मदत केली आहे, त्यासाठी आम्ही भारताचे आभार मानतो.

‘भारताकडून मदतीची अपेक्षा’

पुढे बोलताना अर्थमंत्र्यांनी म्हटले की, सध्या श्रीलंकेचे विदेशी मुद्रा भंडार झपाट्याने कमी होत आहे. आयातीसाठी पुरेशा प्रमाणात चलनसाठा नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. दुसरीकडे श्रीलंकेत माहागाई देखील गगनाला भिडली आहे. त्यामुळे वस्तूंच्या आयातीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा स्थितीमध्ये श्रीलंका भारताकडून मदतीची अपेक्षा करत आहे. भारताने श्रीलंकेला इंधन आयातीसाठी 50 कोटी डॉलरच्या मदतीला मंजुरी दिली आहे. आम्हाला अशी आशा की, भारत क्रेडिट लाईनच्या रुपाने एक अब्ज डॉलरपर्यंत मदत करेल.

श्रीलंकेत बिकट परिस्थिती

श्रीलंकेची परिस्थिती बिकट बनली आहे. श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. इंधनाच्या आयातीसाठी पुरेसा चलनसाठा नसल्याने इंधन तुटवडा जाणू लागला आहे. इंधन तुटवड्यापाठोपाठ श्रीलंकेत वीज संकट देखील निर्माण झाले आहे. अन्नधान्य इतके महाग झाले आहे की, अन्नधान्य खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. श्रीलंकेत महागाई वाढल्याने सामान्य जनतेने सरकारवर रोष व्यक्त केला आहे. जनता आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरू लागली आहे.

संबंधित बातम्या

India will be a superpower : अमेरिकेला मागे टाकत भारत होणार महासत्ता, इतक्या दिवसांत गरिबी काढणार पळ; गौतम अदानी यांचा दावा

RBI कडून सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाखांचा दंड! नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

सोन्याची लंका अन्नाला ‘महाग’, जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य, भारताकडूनही मदत

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.