AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल सबसीडी योजनेला शेतकऱ्यांचा विरोध, केंद्राकडून प्रस्ताव मागे

पुन्हा एकदा केंद्र सरकार शेतकऱ्यांपुढे झुकल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची वेळ केंद्रावर आली होती. आता त्या पाठोपाठ आणखी एक महत्त्वाचा  प्रस्ताव शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. वीजबिलावर देण्यात येणारी सबसीडी वीज कंपन्यांना न देता ती थेट ग्राहकांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचा सरकारचा विचार होता.

वीजबिल सबसीडी योजनेला शेतकऱ्यांचा विरोध, केंद्राकडून प्रस्ताव मागे
महावितरणाची आंदोलकांविरोधात तक्रार
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 1:20 PM
Share

नवी दिल्ली : पुन्हा एकदा केंद्र सरकार शेतकऱ्यांपुढे झुकल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची वेळ केंद्रावर आली होती. आता त्या पाठोपाठ आणखी एक महत्त्वाचा  प्रस्ताव शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. वीजबिलावर देण्यात येणारी सबसीडी वीज कंपन्यांना न देता ती थेट ग्राहकांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केल्याने हा विषय लांबणीवर टाकण्यात आला आहे.

बँकांच्या खासगीकरणाचा निर्णय लांबणीवर 

गेल्या वर्षी केंद्रातील भाजपा सरकारकडून तीन नव्या कृषी कायद्यांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हे कायदे शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कायदे रद्द करण्याची मागणी केली होती.  त्यानंतर वर्षभर आंदोलन चालले, अखेर या आंदोलनाला यश आले आणि कायदे मागे घेण्यात आले.  त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाची दोखील घोषणा करण्यात आली होती, मात्र त्याला देखील कर्मचाऱ्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे तो प्रस्ताव देखील लांबणीवर  पडला आहे.

शेतकऱ्यांचा विरोध का?

ज्याप्रमाणे एलपीजी गॅस ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसीडी जमा कण्यात येते, त्याच धर्तीवर  वीजबिलाची सबसीडी देखील वीज कंपन्यांना न देता ती थेट ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचा विचार शासनाचा होता. मात्र  ज्या पद्धतीने हळूहळू ग्राहकांना गॅसवर देण्यात येणारी सबसीडी बंद करण्यात आली, त्याच पद्धतीने वीजबिलावर देण्यात येणारी सबसीडी देखील बंद करण्यात येईल अशी भिती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला असून, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुंतवणुकदारांना साद, तरुण उद्योजकांच्या व्यवसायात गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांशी पंतप्रधानांची चर्चा…

Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.