AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दरमहा 3300 रुपये मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

असाच एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे मासिक उत्पन्न योजना (MIS) आहे, जी एकरकमी पैसे गुंतवल्यानंतर नियमित मासिक पेन्शन प्रदान करते.

पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवणूक करून दरमहा 3300 रुपये मिळवा, जाणून घ्या सर्वकाही
कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये 10 हजार जमा केले, तर सध्या 5.8 टक्के व्याज दराने ही रक्कम मॅच्युरिटी झाल्यावर 6,96,967 रुपये होईल. 5 वर्षात एकूण जमा रक्कम 6 लाख रुपये असेल आणि व्याजाची रक्कम रुपये 99967 असेल. अशा प्रकारे परिपक्वता रक्कम सुमारे 7 लाख असेल.
| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 11:39 AM
Share

नवी दिल्लीः देशात गुंतवणूक करताना इंडिया पोस्ट हा सर्वात विश्वसनीय पर्यायांपैकी एक आहे. पोस्टाच्या योजनांमध्ये सुरक्षित परताव्याची हमी असल्यामुळे सर्व श्रेणीतील नागरिक त्यावर विश्वास ठेवतात. इंडिया पोस्ट सर्व वयोगटातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय देते. असाच एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे मासिक उत्पन्न योजना (MIS) आहे, जी एकरकमी पैसे गुंतवल्यानंतर नियमित मासिक पेन्शन प्रदान करते.

तर ती व्यक्ती फक्त 1000 किंवा 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकेल

जर कोणाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्याला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील आणि ती व्यक्ती फक्त 1000 किंवा 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकेल. गुंतवणूकदार संयुक्त खाते देखील उघडू शकतात, परंतु प्रत्येक खात्यात फक्त तीन सदस्यांची मर्यादा आहे आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाख रुपयांपर्यंत आहे.

व्याजदर नेमके किती?

पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेचा व्याजदर 6.6 टक्के आहे आणि चक्रवाढ व्याजाऐवजी फक्त साधे व्याज देते. 50,000 रुपये गुंतवून तुम्हाला दरमहा 3,300 रुपये पेन्शन मिळू शकते. पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना एमआयएसमध्ये एकूण 16,500 रुपये व्याज मिळू शकते. योजनेमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला दरमहा 550 रुपये पेन्शन मिळेल आणि MIS मध्ये 4.5 लाख रुपये गुंतवल्यास 2475 रुपये किंवा 29,700 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल.

मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढल्यावर शुल्क भरावे लागणार

एमआयएस खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. पण गरज भासल्यास आधी तो मोडता येतो. मात्र, यासाठी खाते उघडल्यापासून एक वर्ष असणे आवश्यक आहे. अकाली पैसे काढण्यासाठी तुमच्या ठेवीच्या रकमेतून 2% शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही 3 वर्षांनंतर पैसे काढले, तर त्यावर 1% शुल्क भरावे लागेल.

संबंधित बातम्या

RBI च्या निर्देशानंतर बँकांनी इंटरचेंज फी वाढवली, नवे नियम काय?

LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस, पटापट तपासा नवे दर

Get Rs 3300 per month by investing in Post Office MIS scheme, know everything

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.