AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मजबूत करत आहे ?

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम जैविक शेती, प्रशिक्षण, तांत्रिक एकीकरण आणि उचित मूल्य निर्धारणाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर पाहूयात याच्या अंमलबजावणीत कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मजबूत करत आहे ?
| Updated on: Nov 24, 2025 | 7:42 PM
Share

शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. आणि शेतकऱ्यांची समृद्धी ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय प्रगतीला थेट प्रभावित करते. कृषी समुदायाच्या उत्थान आणि स्थायी परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी पतंजली योगपीठाने पतंजील किसान समृद्धी कार्यक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम पारंपारिक कृषीला मजबूत करणे, उत्पादकता वाढवणे आणि प्रशिक्षण, संसाधने आणि वैज्ञानिक पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी डिझाईन केली आहे. हा कार्यक्रम प्राचीन भारतीय कृषी तंत्रज्ञानाला आधुनिक एग्रीकल्चर इनोवेशंससह एकीकृत करतो. त्यामुळे लाँगटर्म सॉयल हेल्थ आणि वाढलेली उत्पादकता आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकेल.

कार्यपद्धती आणि अंमलबजावणी

1. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास : पतंजली शेतकऱ्यांना जैविक शेती, नैसर्गिक खते, जल संरक्षण, बीज गुणवत्ते सुधार आणि पिक सुरक्षा विधी संदर्भात शिक्षित करण्यासाठी नियमित कार्यशाळा, ऑन फिल्ड डेमोंसट्रेशन आणि जागरुकता कार्यक्रम आयोजित करत असतो. शेतकऱ्यांना पतंजलीच्या पर्यावरण-अनुकुल कृषी उत्पादनांच्या उपयोगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे हे सुनिश्चित केले जाते की त्यांची पिके रसायनमुक्त आणि पोषक तत्वांनी पुरेपर असतील,

2. ऑर्गैनिक इनपुट्सला प्रोत्साहन : हा कार्यक्रम जैविक खते, नैसर्गिक खते, हर्बल किटकनाशके आणि गौ-आधारित कृषी इनपुट्स ( गोबर ,गोमुत्र ) यांच्या वापरासाठी प्रोत्साहित करतो. रासायिक खतांवरील अवलंबित्व कमी करुन, शेतकऱ्याच्या मातीची सुपीकता आणि दीर्घकालीन शाश्वतता सुधार करतात.

3. सप्लाय चेनला मजबूत करणे :शेतकऱ्यांना थेट खरेदी व्यवस्था, योग्य मुल्य निश्चिती मॉडेल्स आणि पुरवठा साखळी सपोर्टच्या माध्यमातून मदत केली जाते. पतंजली शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट प्रक्रिया युनिट्सना विकण्यास मदत करते. त्यामुळे मधल्या दलालांवाचून योग्य लाभ मिळणे शक्य होते.

4. टेक इंटीग्रेशन : शेतकऱ्यांना कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय प्रमाणन प्रक्रिया, नैसर्गिक शेतीची साधने आणि माती परीक्षण पद्धतींशी परिचित केले जाते.

कार्यक्रमाची व्याप्ती

* उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश सहीत अनेक राज्य –

* पतंजली शेतकरी सेवा केंद्रांशी जोडले हजारो शेतकरी –

* खाद्यान्न, भाज्या, औषधी रोपे आणि हर्बल शेतीसह विविध कृषी क्षेत्र –

हा कार्यक्रम ग्रामीण क्षेत्रात विस्तार करत आहे, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि ज्ञान प्रदान करत आहे.

अंमलबजावणी दरम्यान येणारी आव्हाने

1. बदलाला विरोध : अनेक शेतकरी सुरुवातीला रासायनिक आधारित शेतीपासून जैविक शेती स्वीकारण्यास कचरत होते.

2. जागरूकतेचा अभाव: जैविक शेतीच्या लाभांसंदर्भात माहितीच्या अभाव यास स्वीकारण्यास बाधा येत आहे.

3. पायाभूत सुविधांच्या मर्यादा : दुरच्या ग्रामीण क्षेत्रातील सिंचनाची समस्या, मर्यादित साठवणूक आणि वाहतूक संबंधी आव्हाने

4. प्रमाणीकरणात विलंब: सेंद्रिय प्रमाणन ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे जी लहान शेतकऱ्यांना निराश करू शकते.

पतंजली निरंतर प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचे समर्थन आणि सहज आपलेसे करता येईल अशा कृषी मॉडलच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करत आहे.

 काय झाला परिणाम ?

1. योग्य किंमत निर्धारण आणि शेतीतील प्रक्रीयांवर खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्नात वाढ.

2. जैविक पद्धतीमुळे मातीचा पोत सुधारला, त्यामुळे दीर्घकालिन उत्पादकतेत वाढ झाली

3. ग्राहकांपर्यंत आरोग्यवर्धक उत्पादने पोहचली, त्यामुळे राष्ट्रीय आरोग्यात योगदान मिळाले.

4. शेतकरी सेवा केंद्र आणि प्रोसेसिंग यूनिट्सच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारात वाढ

5. पारंपरिक भारतीय कृषी आणि पर्यावरणीय संतुलन पुनर्संचयित करणे.

एकूणच या कार्यक्रमाने या शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय रुपाने सशक्त बनवले आहे. ज्यामुळे भारताची कृषी पाया मजबूत झाला आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.