AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Credit Card चे बिल थकले मग तुरूंगात खडी फोडावी लागणार? तो नियम माहिती आहे का?

Credit Card Bill: क्रेडिट कार्डवर अनेक जण स्वप्नांच्या भराऱ्या मारतात. काय खरेदी करू नी काय नाही असं अनेकांना होतं. पण एकदा तंत्र सुटलं की मग क्रेडिट कार्ड जीवाला घोर लावते. बिल थकले की क्रेडिट कार्डचे ओझे जाणवते. बिल थकले तर खरंच तुरुंगात जावे लागते?

Credit Card चे बिल थकले मग तुरूंगात खडी फोडावी लागणार? तो नियम माहिती आहे का?
क्रेडिट कार्ड बिलImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 24, 2026 | 4:07 PM
Share

Credit Card Bill: धावपळीच्या जीवनात पगार कधी भुर्रकन उडून जातो ते कळतच नाही. मग अशावेळी क्रेडिट कार्ड मदतीला धावते. शॉपिंग असो वा ट्रॅव्हल वा एखादी आपत्कालीन स्थितीत कार्ड स्वॅप केले की झाले. आता खर्च करा आणि मग बिल भरा यामुळे अधिक विचार न करता अनेक जण धडाधड क्रेडिट कार्डचा वापर करतात. पण महिन्या अखेरीस उधळपट्टी झाल्याचे लक्षात येते. कधी कधी क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास टाळाटाळ केली तर मग मोठा भुर्दंड भरावा लागतो. चक्रव्याढ व्याजाने पैसे भरावे लागतात. हे बिल भरताना नाकेनऊ येतात. बिल जर भरले नाही तर तुरुंगवास होतो का?

होऊ शकते तुरुंगवारी?

क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास थेट तुरुंगवारी काही होत नाही. क्रेडिट कार्ड बिलचे प्रकरण हे दिवाणी स्वरुपाचे असते. हे प्रकरण आर्थिक व्यवहाराचे, दोघांतील देवाण-घेवाणीचे असते. हा काही फौजदारी गुन्हा ठरत नाही. हे प्रकरण थेट पोलिसांकडे वर्ग करण्यात येत नाही. बँक अथवा कार्ड कंपनी अगोदर SMS, कॉल अथवा ईमेल पाठवून बिल भरण्यासाठी आठवण, स्मरुन करून देते. कोर्टात प्रकरण गेल्यावर, रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात येऊ शकतात.

केव्हा मामला गंभीर?

केवळ बिल न भरणे हा काही गुन्हा मानल्या जात नाही. पण जर मुद्दामहून खोटी कागदपत्रं देऊन, काही माहिती लपवून अथवा बँक, क्रेडिट कंपनीची फसवणूक करण्यासाठी काही कृत्य केली असेल तर कोर्ट कठोर कारवाई करू शकते. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. डिफॉल्टर होणे हा गुन्हा नाही, पण फसवणूक करणे, धोका देणे हा प्रकार कायद्यात गंभीर मानल्या जातो.

Bill न भरल्यास काय नुकसान?

1. क्रेडिट स्कोरवर थेट परिणाम- एक अथवा दोन महिने जर क्रेडिट बिल भरण्यास उशीर झाला तर क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. भविष्यात गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज घेताना अडचण येऊ शकते. तर बँक नवीन क्रेडिट देण्यास नकार देऊ शकते.

2. व्याज आणि विलंब शुल्क-क्रेडिट कार्ड बिल भरण्याची निश्चित तारीख चुकल्यास आणि त्यानंतर अतिरिक्त मुदत ही संपल्यास मग बँक, कंपनी व्याज अथवा विलंब शुल्क लावू शकते. तर चक्रव्याज वाढाने रक्कम वाढू शकते.

3. जर सवलतीनंतर पण ग्राहकांने, क्रेडिट कार्ड वापरकर्त्याने बिल पेमेंट केले नाही तर कंपनी त्याच्याकडून दंड वसूल करु शकते. ही रक्कम क्रेडिट कार्डच्या बिलावर अवलंबून असते.

4. जर क्रेडिट कार्डचे बिल अधिक असेल तर जादा दंड द्यावा लागेल. प्रत्येक बँकांचा दंड वसूल करण्याचा नियम वेगळा आहे. काही बँका 500 ते 1 हजार रुपयांच्या बिलावर 400 रुपये दंड वसूल करतात. 1 हजार ते 10 हजार रुपयांच्या रक्कमेवर 750 रुपये आणि 10 हजार ते 25 हजार रुपयांच्या बिलावर 950 रुपयांपर्यंत दंड आकारते.

पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!
मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंचा एकाच लिफ्टमधून प्रवास!.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! वडेट्टीवार यांची मागणी.
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज
शरद पवार यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज.
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते
उत्तम मुख्यमंत्री झाले असते म्हणणारेच दादांना तुरुंगात टाकणार होते.